Posts

Showing posts from September, 2024

अदिवासीनां संधी देणे

🏹 ऑलिम्पिक मधे अमेरिका,जपान,व अनेक देशातील मुले,मुली नेमबाजीत चमकतात मग आपला भारत देश का?मागे असा विचार मनात आला ,महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास मंत्रालयातर्फे आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना धनुर्विद्या  शिकविण्याची व्यवस्था करावी. असे मागणी पत्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉक्टर विजयकुमार गावित यांना पत्राद्वारे आदिवासी सेवक डॉ. जयपाल पाटील यांनी केली आहे.रायगड वर रत्नागिरीजिल्ह्यातीलआदिवासी प्रकल्पांतर्गत 14 आश्रम शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना आपत्ती सुरक्षा विषयक प्रशिक्षण दिले असल्याने यावेळी मुलांना गलोल म्हणजेच बेचकी व काठीच्या धनुष्यबाणाची सुरक्षा कशी घ्यावी,ज्यामुळे अनेक मुलांचे  डोळ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र नेमबाजी मध्ये ही मुले अतिशय निष्णात आहेत. यांना आश्रम शाळेत इयत्ता ५वी पासून धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिले. तर ती जिल्हा, राज्य, देशपातळीवर नेमबाजी मध्ये प्रगती करू शकतात व पुढे ऑलिम्पिक मध्येही पोहोचू शकतात. यासाठी शाळेमध्ये असलेले पी.टी.च्या शिक्षकांनाधनुर्विद्येबाबत प्रशिक्षण दिले,प्रत्येक शाळेत धनुर्विद्येचा संच दिला, तर भविष्यात ऑलिम्पिक मध्ये महा...

आता नेहमी विचार करु या

माझे उत्पन्न,  माझे घर,  माझी कार, माझा व्यवसाय,  माझी इतर मालमत्ता इ. हे सर्व सुरक्षित आहे, जोपर्यंत माझा देश सुरक्षित आहे. अन्यथा सर्वकाही आगीत जाईल. नामशेष होईल,आज  २ दशलक्ष युक्रेनियन रशिया-युक्रेन युद्धात सर्व काही मागे टाकून इतर देशांमध्ये आश्रय घेत आहेत.शेजारच्या देशांनी त्यांना आश्रय दिला हे ते भाग्यवान होते.त्या सर्व देशांचे अभिनंदन! आमचे काय होणार???. आम्ही कुठे जाऊ असे तुम्हाला वाटते???एका बाजूला पाकिस्तान, एका बाजूला बांगलादेश, खाली हिंदी महासागर, वर चीन, देशाच्या आत काही ठिकाणी असंख्य गद्दार!!!,कोणाचे तरी ऐकून बॉम्बस्फोट करतात.आता आपल्या देशाचे  संरक्षण मंत्री, गृहमंत्री,  गृहमंत्रालय, भारतीय सैन्याचे भुदल, नौदल, हवाईदल तिन्ही दल,  बॉर्डर सेक्युरिटी, फोर्स,सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ईतर सुरक्षा दले आणी देशभरातील पोलीसदले सतर्क आहेतच,  काळजी नको,न जाणो आपल्या देशावर चुकुन एखादी आपत्ती आली तरीसुद्धा लक्षात ठेवा की तुम्हाला आश्रय देण्यासाठी दुसरा कोणताही देश जवळ नाही.मदत करणारे देश दुर आहेत.आपले पंतप्रधान देशाची प्रगती करीत आहे...

आपल्यामुलांनी उच्च शिक्षण चांगली नोकरी केली पाहिजे असे प्रत्येक आई-वडिलांना वाटते मुले मोठी झालीकी गाव सोडून शहरात, आणि इतर राज्यात व परदेशात गेली आणि मोठया संखेने तिकडचीच झाली आहेत. धनधान्य पैसा अडका भरपूर असून जेष्ठचे जीवन सध्या पाहतो आणी मदत करीत आहोत महाराष्ट्रात आज 1 कोटी 25 लाख ज्येष्ठांची संख्या झाली आहे.ज्येष्ठांचे म्हातारपण बेरोजगारी आजार पण, विकलांगता तुझ्यासाठी सामाजिक सुरक्षितता प्रधान करण्याची ही कार्य राज्य सरकारचे आहे ज्येष्ठांच्या वाढत्या वयोमानाने अनेक समस्यांना त्यांना सामना करावा लागतो यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 29 जुलै 2024 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जेष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी मंडळाची निर्मिती करण्यात येत आहे याबद्दल प्रथमता माननीय मुख्यमंत्री व त्यांचे कॅबिनेट सहकार्य मंत्री यांचे मनापासून अभिनंदन! सरकारने ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 60 व त्याहून अधिक केली असून साधारण जेवताना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्नायू आणि सांधेदुखी, फ्रॅक्चर होणे, संधिवात, कमी ऐकू येणे या आजारांना सामोरे जावे लागते जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता येईल, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे मानसिक व शारीरिक आरोग्य सुस्थितीत व्हावे यासाठी महामंडळाचे कार्यालय मुंबई येथे होणार असून महामंडळासभाग भांडवल राज्य सरकारने 50 कोटी रुपये देण्यात आले असून या मंडळावर भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत अथवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची संचालक म्हणून नियुक्ती केली जाईल.व कार्यालयात पदनिर्मिती करण्याचे परिपत्रक राज्याच्या उपसचिव श्रीमती वर्षा देशमुख यांनी मा. राज्यपालांच्या आदेशाने शासन निर्णय क्रमांक 111/ दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापना च्या प्रती राज्यातील सर्व सर्व प्रमुख अधिकारी यांना पाठविल्याने राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या संघटना महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देत आहे जेष्ठ नागरिकांना त्यांची काळजी घेण्याची सुव्यवस्थेबाबत आम्ही इजराइलच्या कृषी अभ्यास दौऱ्यात प्रत्यक्ष अनुभवले आहे,आनंद झाला म्हणून आपल्या मित्र परिवारांना जेष्टासाठींचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला शासनाचे अभिनंदन🙏- ज्येष्ठ पत्रकार डॉ. जयपाल पाटील