नातेसबंध!!!!!!!
*नाती जीवनात अतूट अशीच पूर्वीच्या काळात होती.त्यांना जपले जात होते. तेही आपल्या कुटुंबात एकमेका बद्दल आदर ओत प्रोत वहात असे,जेष्ठ आणि वरिष्ठ यांचा आदर राखला जात होता.यामध्ये बहीण-भावाचे नाते अतूट असायचे लग्न न झालेल्या बहिणीची गावात कोणी छेड काढली तर एकट्याने अथवा कुटुंबातील भाऊ व गल्लीतील मित्रांसोबत त्याची धुलाई झालीच म्हणून समजाआणि तेव्हा कळले आपल्या पूर्वजांनी रक्षाबंधन, भाऊबीज हे सण आपल्यात का?निर्माण केले.मात्र या नात्याला सुद्धा सध्याच्या काळात दृष्ट लागली. परवा एका नातेवाईकच्या हळदी समारंभाला गेलो होतो.कोविड-19 मुले साधारण 30 ते 32 नातेवाईक उपस्थित होते.अंगणातील मांडवात घरातील कुटुंब सख्के असून देखील लांब लांब बसली होती शेजारी बसलेल्या एकास विचारलं काय चाललंय हल्ली घरामध्ये मी बऱ्याच वर्षानी गेलो असल्याने मी प्रश्न विचारला?माझे कडे पाहून म्हणाले 10 लाख रुपये गुंठा झाला आहेना. भावानी बहिणीला हिस्सा दिला नाही म्हणून हे असे. मित्रांनो वडिलांचे खूप पूर्वी निधनानंतर1 ते 2 असलेल्या बहिणींनी आपल्या भावासाठ...