Posts

Showing posts from April, 2025

✒️मी गुणवंत कामगार!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर थळ येथे 1979 ला  मटेरियल कलेक्टर कमवाहन चालक म्हणून नोकरीस लागलो. कारखान्यासाठी लागणारे साहित्य मुंबई, ठाणे, पुणे येथून आणावयाचे काम माझे होते. कारखान्याला लागणारी चार ते 26 चाकी वाहने सुद्धा आणली, पेण ते थळ  रेल्वे लाईन कारखान्याची सुरू झाली. मध्य रेल्वे कडून 2 इंजिन खरेदी करण्यात आली. जीवनात शिकत राहायचे ही भावना असल्याने माझी जनरल मॅनेजर यांनी रेल्वे इंजिन पायलट म्हणून नियुक्ती केली.  प्रशिक्षणासाठी मी, माझी पत्नी जयश्री,  माझी कन्या बाळ पल्लवीला घेऊन शकूरबस्ती, दिल्ली येथे प्रशिक्षणास गेलो, आमची तिघांची पहाडगंज नवी दिल्ली येथे एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती. आणि तेथे मला रेल्वे इंजिन चालविण्याचे अधिकृत परवाना मिळाला. त्यावेळी मी पानिपत, मसूरी, हरिद्वार,ऋषिकेश येथे शनिवार रविवार पाहण्याचा आनंद घेतला. जाताना राजधानी एक्सप्रेस येताना विमान प्रवास आयुष्यात प्रथम अनुभवला.  आम्ही आर.सी.एफ. थळ  मध्ये सुरुवातीला 19 जण होतो, नंतर वाढ होऊ लागली येथे 23 वर्ष नोकरी करून व्ही.आर.एस. घेऊन समाजसेवा करू लागलो.छायाचित्रण वाचनाची लेखनाच...

✒️आमची नोंद घेतली!

मित्रांनो पत्रकार क्षेत्रात साधारण 35 वर्षाची वाटचाल, बरेच चढ उतार अनुभवले, या क्षेत्रातील अनुभवाने येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावयाची याचे कायम क्षेत्रात नव्याने येणारे पत्रकार असलेले संपादक यांना प्रकाशक म्हणून देशभरात आणि स्वतःचे दिल्लीमध्ये कार्यालय असलेल्या लीपा या संघटनेत राज्य ते देशपातळीवर पदाधिकारी, साप्ताहिक संपादक म्हणून स्मॉल न्युज पेपर ऑफ इंडिया संघटनेचा राज्य पदाधिकारी ते राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून कार्य, साप्ताहिक संपादक संघटनेचा जिल्हा राज्य पातळीवरील पदाधिकारी, भारतीय पत्रकार संघ (ए. आय. जे.) चा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्य, महाराष्ट्रातल्या संपादक पत्रकार संघासाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघटनेचा संचालक आणि महाराष्ट्रातील साप्ताहिक संपादक पत्रकार छायाचित्रकारांसाठी कार्यरत असलेल्या साहित्य संगम व दैनिक युवावताचे संस्थापक संपादक श्री. किसन भाऊ  हसे यांच्याही  संघटने  राज्य पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.हे सर्व सांगण्याचे कारण की आपण निस्वार्थपणे कार्य करीत असतो हे कोणी कौतुक करावे म्हणून नव्हे तर आपल्या मनाला आनंद मिळतो ...

✍️आनंदी आनंद आपत्ती व्यवस्थापनाचा!

 समाजामध्ये आपले कुटुंबासमवेत जीवन जगताना काहींना समाजसेवेची आवड असते आणि आपले गाव परिसर याचा विकास करावयाचा असल्यास कोणत्यातरी सरकार मान्यता प्राप्त राजकीय पक्षात प्रवेश करावा लागतो त्या कार्यकर्त्याचा सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्याला पक्षाचा पदाधिकारी केला जातो तो ग्राम पंचायत सदस्य सरपंच पुढे तो पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद सदस्य सभापती उपाध्यक्ष आणि अध्यक्ष होऊन पक्ष त्याला पुढे आमदार आणि खासदार म्हणून निवडणुकीत उभे करते या सर्व सापशिडीमध्ये विरोधी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी काही वेळा त्या कार्यकर्त्यावर खोट्या केसेस दाखल करून समाजात बदनामी करण्याच्या तयारीत असतात तर काही गुन्ह्याची नोंद पोलीस ठाण्यात होऊन न्यायालयात केस दाखल होते तेव्हा मात्र काहींना जेलमध्ये बंदी होण्याची वेळ काही जणांवर येते निकालाला काही महिने तर वर्षही जाते त्यामुळे त्याच्या गावाकडे कुटुंबाचे हाल होतात आणि जेलमध्ये राहिल्याने शिक्षित किंवा अशिक्षित असणार तरी मनावर परिणाम होऊन आता पुढे समाजात जीवन कसे जगायचे याची अनेक जणांवर आपत्ती येते असे अनेक प्रसंगात अडकल...