✍️जीवन सुरक्षेचे तीन तेरा!
महाराष्ट्रामध्ये हजारो व्यक्तींनी आपल्या स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना घेऊन आपल्या जीविताची काळजी घेतली आहे मुळात समाजातील मोठमोठे व्यवसायिक, निवृत्त सरकारी अधिकारी, आमच्यासारखे पत्रकार यांनी आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी शासनाकडे म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला. त्याबाबतची संपूर्ण जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून चौकशी होऊन अर्ज केलेल्या व्यक्तीस स्वरक्षणार्थ शस्त्र परवाना दिला जातो. त्यानंतर त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते शस्त्र भारतीय बनावटीचे अथवा परदेशी बनावटीचे घेतात त्यांना खरोखरच आपल्या जीवाची भीती असतेआणि त्यामध्ये राज्यात जेव्हा कधीही विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका येतात त्यावेळी दिल्ली येथून निवडणूक आयुक्तांचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पोहोचतात की ज्या लोकांकडे शस्त्रे आहेत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे जमा करावी असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोहोचतात आणि स्थानिक पोलिसांकडून शस्त्र जमा केली जातात मग त्यांच्या मौल्यवान जीवाचे काय हा प्रश्न निर्माण होतो. आमच्याकडे ही शस्त्र परवाना आहे मागील लोकसभेच्या वेळी पोलिसांनी सूचना केल्याप्रमाणे शस्त्र जमा क...