Posts

Showing posts from December, 2020

आपत्ती व्यवस्थापन, आठवण

आठवण आजच्या दिवसाची साप्ताहिक रायगडचा युवक आणि  मर्शियल आर्ट कराटे ट्रेनिंग,अध्यक्ष दर्शन प्रभूच्या                सहयोगाने सिव्हिल डिफेन्स उरण-रायगड तर्फे पहिले 3 दिवसीय शिबिर दिनांक 26/12/2014 ला अलिबागेत घेतले आणि आज लाखो जनते पर्यन्त पोहोचले आहे,देश भरात येत असलेल्या आपत्ती मूळे राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण तर्फे पंतप्रधान कार्यलय तर्फे10 पाइंट नुसार देश भरतील आपत्ती व्यवस्थापन तज्ञा कडून स्वयंसेवक तयार  करण्याची   योजना आहे,त्याची केंद्रीय गृह खात्याने इयत्ता 8 वी ते 12वी च्या विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन चे प्रशिक्षण साठी जिल्हा पोलिस दल तर्फे शिक्षक तयार करण्यासाठी पहिले शिबीर घेतले त्यांचा मी प्रशिक्षक म्हणून सुरवात केली आणि कोविड-19 ची लाट आली. आता केंद्र सरकार च्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे तर्फे त्या साठी माझ्या सहीत देश भरातील अनेक तज्ञाना प्रशिक्षण ऑन लाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे,त्या मध्ये मी निमंत्रित आहे,  मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन विषयी अभ्यास व प्रशिक्षण दिल्याने रायगड जिल्हा परिषद ने "रा...

नावात कायआहे।

नावात काय आहे, बरंच काही आहे.नुसते नाव सांगितले की कोणत्याही कार्यालयात गेलेल्याचे काम झटकन होते.त्या मधेच सामाजिक, शैक्षणिक, संस्थेच्या लेटर हेड वर एखाद्याचे सल्लागार म्हणून नाव असेल ते नाव सर्वश्रुत असल्याने संस्थेचे कामही अतिशय तातडीने होण्यास सुखकर असते म्हणूनच नावात काय आहे असे बोलले जाते. एखादी व्यक्ती समाज कार्यात, त्या विशिष्ट समाजात ,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यानी समाजाचे देणेकरी या नात्याने अनेक वर्षे घटवलेलीअसल्याने त्याची लोकप्रियता अतिशय चांगली असल्याने त्याने कधीही सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना त्रास दिला नसेल तर त्याचे नावही सरकारी यंत्रणेत महत्त्व पूर्ण असते त्याचे  नाव संस्थेच्या  लेटर हेडवर असणे महत्वाचे असते.समाज सेवे साठी एखादी संस्था स्थापन करणे तिचे अध्यक्ष पद मिरवणे हे पाहिजे तितके सोपे नसते आणि त्यामुळे  जलसी वृत्ती व स्पर्धा मूळे त्रासही सहन करावा लागतो. अधिकारी मंडळी अभ्यासाने अतिशय हुशार असतात त्यातील काही जण नियमावर  बोट ठेवतात यासाठी समाजात राहून अनेक वर्ष उत्तम सेवा दिली, केलीतरच नावाला महत्व प्राप्त होते.हे अनेकांना अजून माहीत ना...

आई-वडिलांचा संभाळ

आपल्याला समाजात वावरायला, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि सुंदर जीवन जगण्यासाठी संधी ज्या आई वडिलांचे उपकार आपले जन्मातही विसरता येणार नाहीत.ते वृद्ध झाल्यावर त्यांना सांभाळणे हे आपल्या संस्कृती नुसार आपली असते पण अनेक महाभाग नोकरी,व्यवसाय मध्ये मोठे झाल्यावर विसरतात तर काही वृद्धाश्रमात सोडून देतात.आणि शेवटी सरकारला कायदा करण्याची पाळी आली सध्या याबाबत सोशल मीडियावर एक सुंदर क्लिप फिरत आहे त्या मध्ये आळदीमध्ये एका रिक्षा मधून दोन भावांनी आई वडिलांना रस्त्यावर सोडले त्यांच्या सभाषणावरून तेथील काही समाजसेवकांनी त्यांना हटकले तेव्हा कळले की दोघेही त्याचीच मुले आहेत मात्र त्याचा उद्दामपणा पणा पाहता हृदय हेलवले शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असो.तर या विषयी मनाला चटका देणारी  सोशल मीडियावर एक क्लिप पहावयास मिळते त्यात उच्च शिक्षण घेतलेला तरुण आपल्या पत्नीचे एकून मुलाला आजोबा प्रिय असतानाही तो वृद्धाश्रम मध्ये सोडण्यास जातो वडिलांचे स्वागत  तेथील प्रत्येक जण करतो वडील सामान ठेवण्यास जातात तेव्हा तो तेथेच बसतो त्याच्या शेजारी एक गृहस्थ येतात त्याच्याशी बोलतात तर त्यानी सांगितले दर मह...