आपल्यामुलांनी उच्च शिक्षण चांगली नोकरी केली पाहिजे असे प्रत्येक आई-वडिलांना वाटते मुले मोठी झालीकी गाव सोडून शहरात, आणि इतर राज्यात व परदेशात गेली आणि मोठया संखेने तिकडचीच झाली आहेत. धनधान्य पैसा अडका भरपूर असून जेष्ठचे जीवन सध्या पाहतो आणी मदत करीत आहोत महाराष्ट्रात आज 1 कोटी 25 लाख ज्येष्ठांची संख्या झाली आहे.ज्येष्ठांचे म्हातारपण बेरोजगारी आजार पण, विकलांगता तुझ्यासाठी सामाजिक सुरक्षितता प्रधान करण्याची ही कार्य राज्य सरकारचे आहे ज्येष्ठांच्या वाढत्या वयोमानाने अनेक समस्यांना त्यांना सामना करावा लागतो यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 29 जुलै 2024 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जेष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी मंडळाची निर्मिती करण्यात येत आहे याबद्दल प्रथमता माननीय मुख्यमंत्री व त्यांचे कॅबिनेट सहकार्य मंत्री यांचे मनापासून अभिनंदन! सरकारने ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 60 व त्याहून अधिक केली असून साधारण जेवताना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्नायू आणि सांधेदुखी, फ्रॅक्चर होणे, संधिवात, कमी ऐकू येणे या आजारांना सामोरे जावे लागते जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता येईल, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे मानसिक व शारीरिक आरोग्य सुस्थितीत व्हावे यासाठी महामंडळाचे कार्यालय मुंबई येथे होणार असून महामंडळासभाग भांडवल राज्य सरकारने 50 कोटी रुपये देण्यात आले असून या मंडळावर भारतीय प्रशासन सेवेतील कार्यरत अथवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची संचालक म्हणून नियुक्ती केली जाईल.व कार्यालयात पदनिर्मिती करण्याचे परिपत्रक राज्याच्या उपसचिव श्रीमती वर्षा देशमुख यांनी मा. राज्यपालांच्या आदेशाने शासन निर्णय क्रमांक 111/ दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापना च्या प्रती राज्यातील सर्व सर्व प्रमुख अधिकारी यांना पाठविल्याने राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या संघटना महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देत आहे जेष्ठ नागरिकांना त्यांची काळजी घेण्याची सुव्यवस्थेबाबत आम्ही इजराइलच्या कृषी अभ्यास दौऱ्यात प्रत्यक्ष अनुभवले आहे,आनंद झाला म्हणून आपल्या मित्र परिवारांना जेष्टासाठींचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला शासनाचे अभिनंदन🙏- ज्येष्ठ पत्रकार डॉ. जयपाल पाटील

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.