✍️औद्योगिक सुरक्षा दिन
आशिया खंडातील सर्वात मोठा फर्टीलायझर चा कारखाना अलिबाग तालुक्यातील थळ येथे माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रमुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्यामुळे आला आणि अलिबाग तालुक्याचे सर्व दृष्टीकोनातून कायापालट झाला सन 1979 साली मी सामान संकलक व वाहनचालक म्हणून कारखान्यात कामाला लागलो. कारखान्याला लागणारे सामान ४चाकी पासून १० चाकी वाहने मुंबईतून थळ येथे आणण्याचे काम मला करावे लागे म्हणून चेंबूर येथील कंपनीत सुरक्षाविषयक होणाऱ्या कार्यशाळेत मला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली, कारखान्याने थळ येथून पेंण पर्यंत रेल्वेचे रुळ टाकले, आणि २ रेल्वे इंजिन विकत घेतली. लोको ऑपरेटर म्हणून प्रशिक्षण घेण्याची नवी दिल्ली येथे रेल्वेच्या सकुरबस्ती येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये शिक्षणाची संधी प्राप्त झाली. कारखान्याच्या कडून वसाहतीत गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्याची सचिव म्हणून माझ्यावर जबाबदारी देण्यात आली होती पुढे मी वेळेचा सदुपयोग म्हणून समाजकार्य व पत्रकारिता करू लागलो कारखान्याची प्रगती जोमाने होऊ लागली आणि मला कारखान्यात पहिला महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंडळातर्फे गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाला, कविता लिहिण्याचा छंद असल्यामुळे लहान मुलांच्या कविता लिहू लागलो त्या आकाशवाणी रत्नागिरी वमुंबईवरुन प्रसारित झाल्याने कामगार कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहित पडू लागलो. दिल्ली- मुंबई विमान प्रवासात श्रीमती रोझा देशपांडे यांचा परिचय झाला होता त्या माँस्को आकाशवाणी मध्ये कार्यरत होत्या. मी कामगार कवी म्हणून ओळख देता आणि माझ्या ६०बाल कविता त्यांनी रशियन भाषेत करून माँस्को आणि ताश्कंदआकाशवाणी वरून प्रसारित करून माझी रशियाचा कामगार अभ्यास दौऱ्यासाठी रशियन सरकारने निवड केली. महाराष्ट्र शासनाने पुढे नागरी संरक्षण दलाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्त केल्यानंतर मुंबई येथील होमगार्ड कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरक्षा विषयक व्याख्याने रायगड जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या अत्यारितील नामांकित जवळजवळ सर्वच कारखान्यांमध्ये माझी व्याख्याने झाली. यामध्ये प्रत्येक कामगारांनी आपण आपल्या कंपनीसाठी काम करतो ही भूमिका कायम ठेवून आपला सुरक्षेसाठी दिलेली सर्व साहित्याचा वापर कारखान्यात कामावर जातानां करावाच असे ठासून सांगत आलो आहे.ऊदा,डोक्यावर हेल्मेट डोळ्यावर चष्मा पायात सेफ्टी शूज, जीवन अनमोल आहे त्याची काळजी आपल्यासाठी व कुटुंबासाठी घ्यायलाच पाहिजे म्हणजे कोणत्याच प्रकारची आपत्ती जीवनात येणार नाही.तमाम सर्व क्षेत्रातील माझ्या कामगार बंधूंना औद्योगिक सुरक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!-डाँ.जयपाल पाटील,गुणवंत कामगार,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ
Comments
Post a Comment