✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!
पुण्यातील आमचा एक मित्र समाजसेवकच कॉलेजच्या जीवनात कोणीही रस्त्यावर दुचाकीवरून पडला तर धावतच मदतीला जाऊन रुग्णालयात पोहोचवण्यापर्यंत मदत पोलिसांनी हाक मारतात साथीदार म्हणून तेथेही मदत वसाहतीमध्ये वडिलांनी नोकरीवर असताना पारशी बाबा कडून विकत घेतलेला घर खरा शेजारील जागेत आई भाजीपाला पिकवत असे, वसाहतीत कोणीही आजारी पडले तर विनू भाऊला शोधायला मुला मुलींच्या सायकली घरी हमखास येत वसाहतीत कोणाचा मृत्यू झाला तर विनू भाऊ हातामध्ये बांबू आणि कोयता घेऊन त्या घरासमोर हजर झाला म्हणून समजा वसाहतीच्या कामासाठी नगरपालिकेत आपला हक्काचा माणूस असावा म्हणून सत्यनारायणाच्या पूजेला ठरवून टाकले. विनू आपला उमेदवार तो काळच असा होता की निवडणुकीला पैसे लागत नव्हते बऱ्यापैकी श्रीमंत असलेला माणूस पेंटरला बोलून रिकाम्या जागेवर फोटो सहित जाहिरात केली जायची एका मान्यता प्राप्त राजकीय पक्षांनी त्याला हेरला होता आणि आपल्या पक्षातर्फे निवडणुकीचा तिकीटही देऊन जाहीर केले विनू भरघोस मतांनी निवडणूक जिंकला आणि सर्वांचा लाडका विनू भाऊ नगरसेवक झाला. पुढे पक्षाने तरुण कार्यकर्ता म्हणून आमदारकीची ही उमेदवारी दिली वसाहतीतील अनेक कारखान्यात नोकरीच असणारे त्याचे मित्रांनी बॅनर झेंडे उमेदवारीची फी वर्गणी काढून भरली आणि विनू भाऊ आमदारही झाले अभ्यासू होतकरू शिकलेला आमदार म्हणून पार्टीच्या नेते मंडळींनी त्याला राज्यमंत्री केला त्याचा सचिव आमच्या गावाकडचा असल्याने त्याच्या हळद आणि लग्नकार्यास येणार म्हणून मला फोनही केला हळदीला मी पुष्पगुच्छ घेऊन गेलो तर मंत्री भाऊ शेतामध्ये सादरीवर बसून माझीच वाट पाहत होते सचिव व त्याचे वडील मला पाहून आश्चर्यचकित झाले नवरदेवाला भेटीचे पाकीट दिले,आणि मंत्री महोदयांना पुष्पगुच्छ देऊन हळदीचे स्वादिष्ट भोजन आणि अरे, तुरे च्या गप्पागोष्टीने भेटीचा आनंद वेगळाच अनुभवला असा आमचा मित्र समाजसेवक आणि राज्याचा राज्यमंत्री विनोद भाऊ! तर दुसरा आमचा पत्रकारितेतला मित्र दगडू भाई मी दैनिक रत्नागिरी टाईम चा जिल्हाप्रमुख असल्याने परिचय झाला. त्याला तेथील वार्ताहर केले. गावापासून तालुक्याला त्याची दहशत तुमच्या घरासमोर पत्र्याच्या शेडचे पत्रकार म्हणून कार्यालय सोबत जमीन विक्री आणि बिल्डरचे फ्लॅट भाड्याने देतो हा व्यवसाय कार्यालयाबाहेर कॅरम चे बोर्ड ठेवलेले तेथे गावातील 10 ते 12 होणार मुलांचा कंपू त्यांच्या सिगरेट पासूनचा सर्व खर्च दगडू भाई करणार रविवार म्हटलं कार्यालयासमोर 15 ते 20 शर्टाची बटणे उडी ठेवून युवक जाणारी येणारी ज्येष्ठांची टिंगल टवाळी करण्यात पर असायची एके दिवशी गावाच्या टोकावर राहणारे जोशी कुटुंब दगडू भाईला भेटावयास आले त्यांची 25 एकर जमीन अगदी जंगलात लागून होती त्याचे कोणीतरी एक झोपडी उभी केली होती आणि कुटुंब राहत होतो जोशी काकांची दोन्ही मुले अमेरिकेत व्यवसाय उद्योगामुळे राहत होती म्हणून दगडू भाईला पैसे देऊन झोपडी काढावयाची होती आणि जागेला तारेचे कंपाउंड करायचे होते.दगडू भाई ची नियत बदल जागा मोजणीच्या नावाखाली वकील मित्रामार्फत जोशी व जोशी काकूंची सही बॉण्ड पेपर वर घेऊन जागेचे बक्षीस पत्र दगडू आईने आपल्या नावावर करून घेतले जागा स्वच्छ मोजणी तार कंपाऊंड यासाठी लागणारे सर्व पैसे जोशी काकांकडून घेतले दगडू भाऊ ने दुसऱ्याची पत्रकारिता म्हणजे आमची सोडून स्वतःचे साप्ताहिक पेपर सुरू केले आणि जोशी काकांच्या जागेतील पाच एकर जमीन निसर्गाच्या सानिध्यातील मुंबईच्या बिल्डरला डेव्हलप साठी देऊन टाक आणि दगडू भाई करोडपती झाला जेव्हा जोशी काकांना आपल्या जागेचे बांधकाम कोण करत आहे याची चौकशी करता दगडू भाई करतो हे समजले दोघेही नवरा बायको त्याला भेटायला रविवारी गेले असता कार्यालयाबाहेर बसलेले त्यांचे पिंटू नी त्या दोघांना हाकलले ते पोलिसांकडे गेले त्यांनी आपले म्हणणे त्यांना सांगितले पत्रकार असलेला संपादक दगडू भाई पोलिसांच्या परिचयाचे होते या जोशी काकांची ची मुले अमेरिकेत असतात त्यांना कधी काळी पैसे लागले तर मीच देत होतो अख्या गावाला माहिती आहे त्यामुळे त्यांनीच मला बक्षीस पत्र करून ही जागा दिली मी ती बिल्डरला डेव्हलपमेंटला दिली या सर्व घटनेमुळे जोशी काकांची दोन्ही मुले भारतात गावी आली मध्यंतरी बिल्डर सोबत दगडू भाई ची हाणामारी पर्यंत मजल गेली कारण बिल्डरने आमची दगड माती सिमेंट घेतले पाहिजे म्हणून. जोशी काकांची दोन्ही दगडू भाईला भेटण्यास केले असता दुसऱ्या दिवशी तालुक्यावरून रात्री बारा वाजता आपल्या आलिशान गाडीतून दगडू भाई येत असताना एका पुलावरून दगडू भाई ची स्विफ्ट गाडी पडली त्यामध्ये असलेले दगडू भाई चे 3 सहकारी होते तेही देवा घरी गेले, अपघात कशामुळे झाला हे कोणालाही कधीही कळलेच नाही. पोलिसांनी चौकशी केली असता, पत्नीने सांगितले की जोशी काका काकू व मुले यांच्यावर संशय नसून मुंबईच्या बिल्डरवर रोख त्यांनी दर्शविला आणि पोलीस तपासाला लागले. आपले करोडो रुपये ठेवून दगडू भाई अनंतात विलीन झाले. शवयात्रे साठी मला फोन आल्याने मी वेळेवर पोहोचलो कुटुंबीय आणि कॅरम खेळणारे तरुण एवढेच जण गावातील एकही माणूस हजर नव्हता. युवकांनो आपल्या जीवनात जनतेचा भाऊ होणे म्हणजे आनंदी जीवन आणि जनतेमध्ये भाई होणे म्हणजे मृत्यू कधी केव्हाही अटळ आहे , हे सांगता येत नाही. यासाठी सामाजिक बांधिलकी जपताना वरील दोघांपैकी आपल्याला कोण व्हायचे आपण आपल्या जीवनात काय करायचे हे ठरवा. - ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील
Comments
Post a Comment