सरदारजी की जय हो
नुकताच आपत्ती व्यवस्थापन व्याखाना निमित्ताने एका कॉलेजच्या श्रम शिबिरा साठी गावात गेलो होतो गावात प्रवेश ठिकाणी शिवरायाचा पुतळा आहे त्यांना नतमस्तक होऊन वेळ असल्याने सावलीत उभा राहिला समोरून 2 ते 5 मुलाचा घोळका येत होता आणि सरदाजी वर जोक्स करताना हशा पिकला होता त्यात एक जण जोक घाणेरडा सांगू लागला माझा पेहराव साधा असल्याने मी मनात आलेल्या रागाने त्यांना थांबविले अरे सरदारांना असे अपशब्द वापरू नये त्याचा आपल्या देशावर फार उपकार आहेत स्वातंत्र लढ्यात सिहाचा वाटा आहे मुले जवळ आली काका हे खरे आहे का?मी म्हणालो तुम्ही काय शिकता?एक जण बोलला कॉलेज तुम्ही सांगा कसे ते?त्याचा अभ्यास पाहून आश्चर्य वाटले चला तुमच्याही मुलांना उपयोगी पडेल पहा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत 42 हजार सैनिक होते त्यात28 हजार शीख तर इतर 14 हजार होते.भारत देशा स्वतंत्र होण्यात4096 जण शाहिद झाले त्या मध्ये शीख 3282 जणांनी आणि इतर 814 जण होते.तर फाशीवर गेलेले एकूण 814 जण लटकलेले त्यातील शीख 773 जण व इतर 41 जण होते.देश स्वतंत्रतते साठी 2846 जणांना उमरकैद झाली त्या मध्ये 2147 शीख होते तर इतर499 जण होते.आपण मागे इतिहासात जाउ या जालियनवाला बाग मध्ये 1300 जण शाहिद झाले त्यामध्ये शीख 799 जण तर इतर 501 जण झाले होते मुलांनो देशाच्या योगदान मध्ये 79%दिले आहे म्हणून त्याची अशी चेष्टा करू नका कारण भारतीय सैन्य मघील शीख रेजिमेंट रांची-झारखंड येथे आपत्ती व्यवस्थापन चे प्रशिक्षण घेतले आहे आणि थोड्या वेळाने तुमच्या शिबीर मध्ये प्रमुख पाहुणा म्हणून येणार आहे मुलांनो तुम्ही कॉलेजला आहात अभ्यास दांडगा करा तुम्हाला मोठे व्हायचे आहे मुलांची पागा पाग झाली मी मात्र शिवाजी महाराजाना नमस्कार करून त्याचे तेज पहात होतो आजचे 295 वे व्याखान नेहमी प्रमाणे शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून च होणार होते न राहून मुलांच्या मनात सरदारांना चिडवण्या पेक्षा त्याचे देशा साठी चे महान कार्याची ओळख दिल्याचा आनंद मिळला अभिमान वाटतो सरदारजिचा,शीख समुदाय याचा सरदारजी की जय हो
Comments
Post a Comment