मन व्यवथापन

   आपले अनमोल जीवन जगताना अनेकांची हळवी,आनंदी, कडक मनाचे अनुभव आपण घेत आलो आहोत.त्या मध्ये कधी नव्हे ती आपल्या जीवनात कोरोनारीच्या महामारीचाअनुभव आपण घेतले आहेत.सरकारी सूचनांचे काटेकोर पालन करून दुसऱ्याला मदत करण्याचे आमचेही मन आम्ही अनुभवले आहे.कालच मित्र भेटला त्यालाही कोरोनाला प्रसाद मिळाला होता त्याने सरकारी रुग्णालयाचा अनुभव घेतला,अगदी पहिल्या दिवसापासून त्याच्या मनाला उत्तम साथ देत होतो.काही होणार नाही डॉ कटराच्या सल्ल्यानुसार वाग आणि या भयंकर रोगावर त्याने मात केली 10 किलो वजन कमी झाले बरा होऊन महिना झाला तरी सायंकाळी समुद्र किनाऱ्यावर का?येत नाही तर म्हणतो मला भीती वाटते .मला माझे मन सांगते की त्या रुग्णालया समोरून जायचे नाही मन त्याचे घाबरू लागले पण अश्या मित्रांना आपण भेटून त्याच्या मनाची भीती घालविण्यासाठी वेगळी ऊर्जा देण्याचे काम केले पाहिजे.                           एक मित्र कोरोनाला घाबरून पुण्याला जातो असे सांगू लागला सर्व ठिकाणी कोरोनाची भीती  वाटते म्हणून जागा बदलून कसे चालेल.सरकारी नियमांचे योग्य प्रकरे पालन केल्याने कोरोना तुमच्या जवळ फिरकला का? दिवस भरात काही कारणास्तव कुटुंबातील सदस्य, नोकर याच्यावर आपण उगीचच डाफरतो त्या मुळे अधिक मनस्ताप मूळे आपल्याला विविध रोग मैत्री मरण्यास येतात त्या साठी सदा आनंदी रहा,व्यायाम करा,वेळेवर चहा,नास्ता, भरपुर पाणी म्हणजे कुठलेही रोग आपणास श्यक्यतो जवळीक करणार नाहीत.     रात्री झोपेच्या जागेवर पडताच मी दिवसभर ज्यांना त्रास दिला असेल त्यानीं मला माफ करावे असे आपल्या मनाना सांगून ज्याने तुम्हाला या भूतलावर पाठविले  आहे त्याचे आभार मानून मन स्थिर करा,दिवस भरातातील चिंता असतील त्या मनाला सांगा, व हे ही दिवस जातील ही भूमिका ठेऊन मन शांत ठेवा झोप काही वेळेत लागेल .                तुमचे कितीही वय वाढले असले तरी तुम्ही सदा तरुण आहात असे मनाला सांगुन पहा कश्या गुदगल्या होतात त्या अनुभवा, सदा सर्वदा कोणीही कितीही वाईट बोलला(असे काही मित्र-मैत्रिणी तोंडावर बोलणारे असतात)तरी मनाला अजिबात वाईट वाटून घेऊ नका ,ते आपले काही चुकत असेल असे मनाला पटवून घ्या. आणि तो विषय मनातुन काढून टाका आणि मन कायम प्रफुल्लित ठेऊन सदा आनंदी, प्रसन्न, हसतमुख,नीटनेटके राहून आपले जीवन व्यतीत करा.आठवणीने दिवस भरात दुसऱ्या बद्दल चांगले बोला आणि इतरांना त्याचे चांगले सांगा म्हणजे आपल्या मनाला आनंदी ठेवण्यास मदत होईल,मीच जगात अतिशय शहाणा आहे ही भूमिका सोडून मन अगदी लहान,तरुण ,आपल्या वयाचे आणि जेष्ठ चे ऐकून घेण्याची सवय मनाला लावून घेतली तर आपले जीवन सदाबहार फुलासारखे होईल आणि मन प्रफुल्लित राहील--रायगड भूषण जयपाल पाटील 【B】(मो,9673727277

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.