नातेसबंध!!!!!!!
*नाती जीवनात अतूट अशीच पूर्वीच्या काळात होती.त्यांना जपले जात होते. तेही आपल्या कुटुंबात एकमेका बद्दल आदर ओत प्रोत वहात असे,जेष्ठ आणि वरिष्ठ यांचा आदर राखला जात होता.यामध्ये बहीण-भावाचे नाते अतूट असायचे लग्न न झालेल्या बहिणीची गावात कोणी छेड काढली तर एकट्याने अथवा कुटुंबातील भाऊ व गल्लीतील मित्रांसोबत त्याची धुलाई झालीच म्हणून समजाआणि तेव्हा कळले आपल्या पूर्वजांनी रक्षाबंधन, भाऊबीज हे सण आपल्यात का?निर्माण केले.मात्र या नात्याला सुद्धा सध्याच्या काळात दृष्ट लागली. परवा एका नातेवाईकच्या हळदी समारंभाला गेलो होतो.कोविड-19 मुले साधारण 30 ते 32 नातेवाईक उपस्थित होते.अंगणातील मांडवात घरातील कुटुंब सख्के असून देखील लांब लांब बसली होती शेजारी बसलेल्या एकास विचारलं काय चाललंय हल्ली घरामध्ये मी बऱ्याच वर्षानी गेलो असल्याने मी प्रश्न विचारला?माझे कडे पाहून म्हणाले 10 लाख रुपये गुंठा झाला आहेना. भावानी बहिणीला हिस्सा दिला नाही म्हणून हे असे. मित्रांनो वडिलांचे खूप पूर्वी निधनानंतर1 ते 2 असलेल्या बहिणींनी आपल्या भावासाठी हक्क सोडपत्र तलाठ्यांकडे देऊन आपल्या आई-वडिलांच्या जागेवरून हक्क सोडला तेव्हा जागेला किंमत नव्हती आता पर्यटन विकास झाला म्हणून 10 ते25 लाख रुपये गुंठा भाव झाल्याने बहीण तिचा पती,मुलेमुली आपला मामा थोडी शेती वाडी विकून बंगला,चार चाकी गाडी चालवताना पाहू लागले आपली आई व वडील साधे घर आणि सायकल अगदीच कर्ज काढून मोटरसायकल वर फिरत आहोत.तरी सुद्धा काही बहीण भाऊ आपले नाते सबंध टिकवून आहेत सुख वस्तू असलेल्या भगिनी कायद्याने जरी वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा दिला असला तरी आपला 1 किव्हा 2-3 भाऊ असले तर त्यांना समान हिस्सा पूर्ण मिळावा म्हणून भगिनी,तिचे पती,मुले मुली आपण हुन आपला सर्व हिस्सा आपल्या भावांना देतांनाही दिसत आहेत आणि त्याचे नातेसबंध पूर्वापार आनंदी, सुख दुःखात एकत्र येतांना दिसतात. या एकाच कारणामुळे अनेक बंधुराज आपल्या व्यसनापोटी देशोधडीला लागलेले अनेक गावांत आपणास पहावयास मिळतील. अनेक जण आपल्या ओळखी विसरल्या दुःखाच्या वेळी येण्याचे टाळू लागले.त्या मध्ये कोविड-19 मूळे तर अनेकांना नामी संधी आली अगदी कोरोनामूळे जवळच्या कुटुंब मध्ये मृत्यू झाला त्याचे शेवटचे क्रिया कर्म सरकारी किव्हा सामजिक कार्यकर्ते यांनी उरकले,असे नातेसबंध एकमेकांना पारखी झाली आहेत पैसा, जागा,संपत्ती मूळे आपले पणात दुरावा निर्माण झाला आहे आणि आनंद हिरावून गेलंय तेव्हा नातेसबंध कुटुंबियाशी चांगले जपा आणि सुंदर, हसत खेळत आयुष्य जगा*
Comments
Post a Comment