नावात कायआहे।
नावात काय आहे, बरंच काही आहे.नुसते नाव सांगितले की कोणत्याही कार्यालयात गेलेल्याचे काम झटकन होते.त्या मधेच सामाजिक, शैक्षणिक, संस्थेच्या लेटर हेड वर एखाद्याचे सल्लागार म्हणून नाव असेल ते नाव सर्वश्रुत असल्याने संस्थेचे कामही अतिशय तातडीने होण्यास सुखकर असते म्हणूनच नावात काय आहे असे बोलले जाते. एखादी व्यक्ती समाज कार्यात, त्या विशिष्ट समाजात ,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात त्यानी समाजाचे देणेकरी या नात्याने अनेक वर्षे घटवलेलीअसल्याने त्याची लोकप्रियता अतिशय चांगली असल्याने त्याने कधीही सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना त्रास दिला नसेल तर त्याचे नावही सरकारी यंत्रणेत महत्त्व पूर्ण असते त्याचे नाव संस्थेच्या लेटर हेडवर असणे महत्वाचे असते.समाज सेवे साठी एखादी संस्था स्थापन करणे तिचे अध्यक्ष पद मिरवणे हे पाहिजे तितके सोपे नसते आणि त्यामुळे जलसी वृत्ती व स्पर्धा मूळे त्रासही सहन करावा लागतो. अधिकारी मंडळी अभ्यासाने अतिशय हुशार असतात त्यातील काही जण नियमावर बोट ठेवतात यासाठी समाजात राहून अनेक वर्ष उत्तम सेवा दिली, केलीतरच नावाला महत्व प्राप्त होते.हे अनेकांना अजून माहीत नाही. एखाद्याचे नाव घेतले तर त्या वक्तीची माहिती नसताना टिप्पणी करणे हा समाजात सध्या जोरदार उद्दोग सुरू आहे .स्वताला इतिहास -भूगोल माहीत नसताना आपला मोठेपणा करण्यात गुंग अनेकजण असतात.आपले नाव सांगितल्या वर त्याच्या चेहऱ्यावरील भावआणि मिळणारे सहकार्य यामध्येच आपल्या नावाची किमया किती थोर आहे याचा अनुभव कोणी बोलल्या शिवाय अनेकदा मिळतो यालाच नावात काय आहे हे आपल्याला अनुभवला मिळते.
आपल्या नावाला उगीचच महत्व प्राप्त होत नाही यासाठी दाडगा अभ्यास, तोंडात साखर व डोक्यावर बर्फाची लादी आणि आयुष्यातील अनेक वर्षे ,दिवस समाजा प्रति सेवेत दिली की आपले नाव दूरवर जाण्यास कोणतीही अडचण येत नाहीच आपण समाजाप्रती करीत असलेल्या कामांची नोंद सर्वत्र ठेवली जाते आणि आपला आदर्श इतरांनी घ्यावा म्हणून सरकार,विविध संस्था आपला सन्मान करतात,पुरस्कार देतात आणि आपल्या नावाला वेगळे महत्व प्राप्त होते आपण समाजाप्रती करीत असलेल्या कामांमुळेच मित्र -मैत्रिणीचा गोतावळा आपल्या भोवती एकत्र होऊ लागतो आणि आपणाला कळू लागले आपल्या नावात काय आहे. सध्याच्या काळात जनता अतिशय हुशार आहे.आपली इथंबूत माहिती प्रत्येक जण ठेवत असतो तो त्याचा अभ्यास आहे पण आपण परिश्रमाने आपले नाव कमावू शकता आणि आपल्या नावाची जादू चांगली नाव न सांगता अनुभवू शकता नशिबाने आपण या समाज्यात वावरत आहात तेव्हा प्रत्येका सोबत चांगलेच वागा,सदा चेहऱ्यावर हास्य ठेवा,दुसऱ्याचे चांगले होईल व सर्वजण सुरक्षित राहतील असे वागणे ठेवा आणि दुसऱ्याचे कौतुक करा .तेव्हा नावात काय आहे बरच काही आहे
Comments
Post a Comment