आपत्ती व्यवस्थापन, आठवण
आठवण आजच्या दिवसाची साप्ताहिक रायगडचा युवक आणि मर्शियल आर्ट कराटे ट्रेनिंग,अध्यक्ष दर्शन प्रभूच्या सहयोगाने सिव्हिल डिफेन्स उरण-रायगड तर्फे पहिले 3 दिवसीय शिबिर दिनांक 26/12/2014 ला अलिबागेत घेतले आणि आज लाखो जनते पर्यन्त पोहोचले आहे,देश भरात येत असलेल्या आपत्ती मूळे राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरण तर्फे पंतप्रधान कार्यलय तर्फे10 पाइंट नुसार देश भरतील आपत्ती व्यवस्थापन तज्ञा कडून स्वयंसेवक तयार करण्याची योजना आहे,त्याची केंद्रीय गृह खात्याने इयत्ता 8 वी ते 12वी च्या विद्यार्थी यांना आपत्ती व्यवस्थापन चे प्रशिक्षण साठी जिल्हा पोलिस दल तर्फे शिक्षक तयार करण्यासाठी पहिले शिबीर घेतले त्यांचा मी प्रशिक्षक म्हणून सुरवात केली आणि कोविड-19 ची लाट आली. आता केंद्र सरकार च्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे तर्फे त्या साठी माझ्या सहीत देश भरातील अनेक तज्ञाना प्रशिक्षण ऑन लाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे,त्या मध्ये मी निमंत्रित आहे, मित्रांनो आपत्ती व्यवस्थापन विषयी अभ्यास व प्रशिक्षण दिल्याने रायगड जिल्हा परिषद ने "रायगड भूषण" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले "तर माझी 2017 ला 4थ्या जागतिक आपत्ती परिषदेत निवड होऊन " दोन चाकी वाहन अपघात"या लेखची निवड झाली होतो, तर पुन्हा 5 व्या जागतिक आपत्ती परिषदेत निवड होऊन "कोविड नंतर काय"या लेखाची निवड करण्यात आली व ती परीषद कोविड मुळे पुढील वर्षी होणार आहे,हाविषयशाळा,महाविद्यालयात , आश्रम शाळा मध्ये शिकवत असताना प्राथमिक शाळेत शिकविले पाहिजे असे जेव्हा आमच्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आताच्या महाराष्ट्र राज्य मंत्री महोदया अदिती तटकरे व विरोधीपक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या 96 हजार विद्यार्थी व 6200 शिक्षकयांनाप्रशिक्षण, रायगडचे माजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी,रायगड जिल्हा आपत्ती प्राधिकरण च्या सह योगाने देण्या साठी मंजुरी दिली आहे त्या बद्दल यांचा आभारी आहेआणि राज्यात रायगड जिल्हा परिषद आपत्ती व सुरक्षित चे धडे घेणारी होणार याचा मनापासून आनंद होतो, म्हणून या दिवसाचे माझे जीवनात महत्त्व आहे. जे सिव्हिल डिफेन्स चे मंगसुले सर,मुबई,आनंद शिंदेसर मुबंई,कोरी प्रिन्सिपल मॅडम होमगार्ड कोलेज व तेथील शिक्षकमुंबई, लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीकांत देसाईसर रांची झारखंड , डॉ, सिध्र्दार्थ पाटील, भाषा तज्ञ सुनीलप्रधान ,डॉ,राजेश्वरी,डॉ,जी .टी .पाटील,डॉ. अजित गवळी,माझी पत्नी जयश्री माझा मुलगा सत्यम,मुलगीपल्लवी,जावई प्रसाद वैद्य,रोहिणी वैद्य,रायगडचा युवक चे आपत्ती व सुरक्षा मित्र,राज्य भरातील महाराष्ट्र पोलीस,राज्यभरातील 108 रुग्णवाहिकेचे सर्व अधिकारी,पायलट ,महाराष्ट्र तील सर्व पत्रकार यांचा मी आभारी आहे तसेच वर्षे भर कोविड आणि चक्रीवादळ मध्ये मी आणि माझे आपत्ती मित्र यांनी केलेल्या सेवेबद्दल कोरोना योद्धा म्हणून सन्मान केलेल्या सर्व राज्य भरतील 6 संघटनांचा आभारी आहे कोविड काळात प्राणी मात्राची ची सेवा करताना अनेक मित्र ,संघटननी मदत केली ते सर्व फोऊडेशनच्या "आपत्ती मित्र पुरस्कार" वितरण कार्यक्रम व अंकात प्रकाशित करू ,त्या मध्ये नावे जाहीर करू त्याचेही आभार ,आपणही कोणत्याही आपत्ती वेळी मदत करून प्रशासनास मदत करा ,तेव्हा करू या देश सेवा!!!!--- रायगड भूषण जयपाल पाटील,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ
Comments
Post a Comment