आई-वडिलांचा संभाळ

आपल्याला समाजात वावरायला, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि सुंदर जीवन जगण्यासाठी संधी ज्या आई वडिलांचे उपकार आपले जन्मातही विसरता येणार नाहीत.ते वृद्ध झाल्यावर त्यांना सांभाळणे हे आपल्या संस्कृती नुसार आपली असते पण अनेक महाभाग नोकरी,व्यवसाय मध्ये मोठे झाल्यावर विसरतात तर काही वृद्धाश्रमात सोडून देतात.आणि शेवटी सरकारला कायदा करण्याची पाळी आली सध्या याबाबत सोशल मीडियावर एक सुंदर क्लिप फिरत आहे त्या मध्ये आळदीमध्ये एका रिक्षा मधून दोन भावांनी आई वडिलांना रस्त्यावर सोडले त्यांच्या सभाषणावरून तेथील काही समाजसेवकांनी त्यांना हटकले तेव्हा कळले की दोघेही त्याचीच मुले आहेत मात्र त्याचा उद्दामपणा पणा पाहता हृदय हेलवले शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असो.तर या विषयी मनाला चटका देणारी  सोशल मीडियावर एक क्लिप पहावयास मिळते त्यात उच्च शिक्षण घेतलेला तरुण आपल्या पत्नीचे एकून मुलाला आजोबा प्रिय असतानाही तो वृद्धाश्रम मध्ये सोडण्यास जातो वडिलांचे स्वागत  तेथील प्रत्येक जण करतो वडील सामान ठेवण्यास जातात तेव्हा तो तेथेच बसतो त्याच्या शेजारी एक गृहस्थ येतात त्याच्याशी बोलतात तर त्यानी सांगितले दर महिन्याच्या मुलाच्या वाढ दिवसी येऊन आम्हला त्याच्या पेन्शन मधून गोड जेवण देतात आणि हो त्यानी तो अनाथ मुलगा त्याना मूल नव्हते म्हणून येथूनच त्याला नेला होता तो फार मोठा अधिकारी झाला आहे आणि नातू तर अतिशय गोड आहे आणि मुलाचे डोळे उघडले सुंदर ,सुंदर शिकवण.आता महाराष्ट्र मधील लातूर जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या आई-वडिलांना वृधाश्रम मध्ये ठेवले असल्याचा तक्रारी आल्या होत्या यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल गोविंदराव केंद्रे आणि त्याचे सर्व सदस्य यांनी परिषदेचे 14 हजार कर्मचारी यांना जे कर्मचारी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवतील त्याच्या पगाराचे 30 टक्के रक्कम आई-वडीलाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी मजुरी जनरल सभेत घेतली आहे आणि असा कुटुंब बाबत निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद आहे .हा आवळा वेगळा निर्णय घेतला त्या बद्दल अध्यक्ष व सदस्य आणि विशेष करून कर्मचारी युनियन चे हार्दिक अभिनंदन असा निर्णय महाराष्ट्र जिल्हा परिषदेने घ्यावा जेणे करून लाखो कुटूंब एकत्र नांदतील

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.