ज्येष्ठांची मनोगत
*🙏जीवन सुगंध*
आपल्या जीवन प्रवासात वेळ हा शब्द आपल्या सोबत मरणाची ती वेळ येईपर्यंत राहणार आहे, रहात आहे. मात्र त्याचा सदुपयोग केला तर कोणत्याही वयात आनंद घेता येतो. सामाजिक कार्य आणि पत्रकारिता क्षेत्रात असल्याने हजारो मित्र मैत्रिणी आहेत. आणि दिवसेंदिवस वाढत आहेतच. त्यातील अनेक जण सरकारी नोकरी. कारखान्यातून वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यावर,व्ही. आर. एस. सेवानिवृत्त होऊन. आपल्या आवडीच्या घरी राहतात. त्यातील अनेक जण धनधान्य विपुल,सुखवस्तू , मुले, सुना नोकरी करीत असल्याने अनेक जण एकटे पडतात. आणी करायचे काय? असा अनेकांना प्रश्न पडतो. मुळात आपल्या लहानपणी काही गोष्टींची आवड असून सुद्धा सवड नसते तर आईवडिलांच्या आवडीने शिक्षण घेऊन नोकरी,उद्योग व्यवसाय केलेला असतो. आणि मनातल्या आवडी राहून गेलेल्या असतात.आपल्यात असलेले गुण ओळखा,आपणास जीवनात आलेले अनुभव, नव्या पिढीला सांगा, लिहा, सध्याच्या काळात सोशल मीडिया मार्फत ते हजारों लोका पर्यंत पाठवा. मी एवढे वर्ष हे केले ते केले विसरा, मनात राहून गेलेला मार्ग बदला, आणि आनंद मिळवा. ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील. परिसरातील आश्रम, मंदिर, चर्च, मज्जिद, मध्ये जाऊन तेथे भेटणारे सर्व वयातील मित्रांना भेटा त्यांची, त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करा. कोणीही आपल्याला वेडा ठरविला, तरी त्याचा अजिबात विचार करू नका. शेवटी वेडी माणसेच इतिहास घडवितात. Covid-19 च्या महामारीतून सरकारी सूचनांचे आपण तंतोतंत पालन करून, आपण हे दिवस पहात आहोत. आणि मनस्वी आनंद घेत आहोत. खरे तर या वयात आपल्यावर कौटुंबिक जबाबदारी तशी नसल्याने मनसोक्त आनंद लुटण्यासाठी,नियमित समुद्रकिनारा असेल तर, निसर्गाच्या सानिध्यात बागेत,नदी अथवा कालव्या शेजारी, घरून सांगितलेले सामान, भाजीपाला, मच्छी, मटण आणण्याचे काम आनंदाने स्विकारून चालत आपला व्यायाम कसा होईल,हे अवश्य पहावे. तसेच मग लाईट बिल भरावयाचे असल्यास,किंवा सार्वजनिक वाचनालयात नियमित गेल्याने जुने व नवे मित्र मिळतात, आपल्या विचारांना चालना मिळून सदा सर्वदा आनंद हमखास मिळतो. त्याचबरोबर आपला कायम. सवंगडी मोबाईल भाऊ आहेस ना मात्र त्याचा वापर गरजे पुरता करावा.अशाने या वयातही वेळ कसा आणि कधी जातो हे लक्षातही येत नाही. ज्यामुळे आपण कायम आनंदी राहता. तेव्हा आपले वय वाढत चालले आहे. याची जरासुद्धा तमा मनात बाळगू नये. मी कोणीतरी मोठा होतो आणि आहे. ही भावना मनातून क्षणभर काढून टाकून, मित्रानं सारखा आपणही सर्वसामान्य असून या देशाचा नागरिक असल्याने, ज्या समाजात मी वाढलो, राहिलो आणि रहात आहे. त्यामुळे माझी सामाजिक जबाबदारी असल्याने मी कायम दुसऱ्याला मदत करेल असे कार्य करा आणि इतरांना त्याचा आदर्श दिसेल, असे आता प्रत्येक ज्येष्ठांनी करावयास हवे, केले पाहिजे. म्हणजे आपला आदर्श युवक-युवतींनी घेतला पाहिजे. असे माझ्या जेष्ठ मित्र-मैत्रिणींना सांगावेसे वाटते. मग या आमच्या सोबत देशसेवा करू या. =रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील. आपत्ती व्यवस्थापन तज्ञ.मो.९६७३७२७२७७
Comments
Post a Comment