जीवन सुगंध

                                                 
देशभरात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सहयोगाने देशभरात पाच जागतिक आपत्ती परिषदांचे आयोजन करणारी आमची आंतरराष्ट्रीय दर्जाची  डिझास्टर मॅनेजमेंट ,इनिसिटिव्ह एवं कन्व्हर्जेस सोसायटी(DMICS)हैदराबाद ,संस्थेमुळे  देशभरातील व जगातील नामवंत आपत्ती व्यवस्थापनाचे शिक्षण व प्रशिक्षण देणारे अनेकजण यामध्ये सहभागी आहेत. येत्या 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर मध्ये  देवभूमी, डेहराडून उत्तरांचल  येथे 6 वी जागतिक आपत्ती परिषद होणार आहे. याच्या आयोजनाची दिनांक व माहितीपत्राचे प्रकाशन उचलांचलचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवासस्थानी छोट्याशा कार्यक्रमात संपन्न झाले,आयोजकांतर्फे देशभरातील अध्यक्ष डॉ. आनंद बाबू सहित 11 सदस्य आपत्ती व्यवस्थापनातील तज्ञ यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना सांगितले की आमच्या राज्यातील नद्यामुळे पावसाळ्यात व उन्हाळ्यातही अनेक वेळा पूर येऊन आपले मार्ग बदलतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्याचे अतोनात नुकसान होते. सोबत मोठ मोठ्या आपत्या ही येतात, आपण हे सर्व दूरदर्शनच्या माध्यमाने पाहतही असाल यासाठी काहीतरी उपाय सुचवा आपण सर्वजण या विषयातील तज्ञ व असून आपल्या मित्र परिवारांना सुद्धा सांगा. त्यांना आमचे सरकार रोख बक्षीस व मानसन्मान ही करेल.आपल्या सूचना आमच्या राज्याचे अप्पर सचिव डॉ. श्री. विजयकुमार जोगदंडे, आपत्ती प्राधिकरण  उत्तरांचल सरकार, देहराडून यांना पाठवावेत. मित्रांनो आपल्या  चांगल्या सूचनांमुळे उत्तरांचल राज्याचे व देशाचे आर्थिक व जीवित होणारे नुकसान थांबवण्यास मदत होईल मग विचार करताय ना!=रायगड भुषण जयपाल पाटील, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम आणि अभिसरण सोसायटी (डीएमआयसीएस) चे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आपत्ती व्यवस्थापनावरील  जागतिक ६ वी परीषद, काँग्रेसचे समन्वयक (WCDM), माजी जनसंपर्क अधिकारी नागरी संरक्षण दल रायगड,सदस्य, रायगड जिल्हाधिकारी आपत्ती प्रतिसाद दल.मो.९६७३७२७२७७

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.