वेळेचेयोग्य नियोजन करा
कार्यास वेळ अपुरा पडेल.राष्ट्रीय केमिकल आणि फटीलायझर्स लि. कारखान्या मध्ये दररोज पेण पर्यन्त युरिया खताचा भरलेल्या आणि लिक्विड अमोनिया वॅगन आणणे आणि नेणे हे काम. सुट्टीला आणि कामावरून आलोकी समाजसेवा,अशी 23 वर्षे नोकरी केली. कामाच्या वेळी काम त्या मुळे महाराष्ट्र शासनाचा कंपनीत पहिला गुणवन्त कामगार पुरस्कार मिळाला.आता माझेच पहाना पत्रकारिता महत्वाची, समाजाला उपयोगी असेल तेव्हा लेखणी हातात घेतो,आणि आपत्ती व्यवस्थापन मध्ये झोकून दिले नुसते नाही, त्यासाठी सिव्हिल डिफेन्स चे बोरी उरण,होमगार्ड कॉलेज मुबंई,यशदा पुणे,भारतीय सैन्य शीख रेजिमेंट रांची, झारखंड आणि 4वथ्या व 5व्या जागतिक आपत्ती मध्ये प्रशिक्षण, अभ्यास, परिश्रम,करुन पोहचलो. आणी लाखो लोकांना आपत्ती आली तर सामोरे कसे जायचे हे शिकविले, निवृत्त झालो,करायचे काय, व्याखान साठी 2 महिने तारखा बुक होतात यासाठी आपण माझे फेसबुक अथवा युट्यूब चॅनेल "रायगडचा युवक" पाऊन खात्री करू शकता,आणि हो वय आपले आड येत नाही फ़क्त मानसिकता हवी माझे सोबत रायगडचा युवक मध्ये या,सध्या आपत्ती व सुरक्षा मित्र म्हणून तरुण तरुणीचा संच केला आहे,तूम्ही ही सोबत येऊ शकता,केंद्रीय गृह खात्याने देशभरात येणाऱ्या आपत्तीनां सामोरे कसे जायचे यासाठी इयत्ता 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण द्यावे म्हणून रायगड जिल्हा पोलीस दलाने या विषयावर बोलणारे शिक्षक घडविण्यासाठी रायगड वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी शिबीर घेतले. त्या मध्ये रायगडातील 25 अधिकारी यांना शिक्षण देणारा मी पहिला आपत्ती व्यवस्थापन तज्ञ आहे. पहा वेळ पुरणार नाही,माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रम साठी निवृत्त ऍडमिरल एल. रामदास, ब्रिगेडियर हेमंत महाजन, लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीकांत देसाई, डॉक्टर सिद्धार्थ पाटील, डॉक्टर जे. टी. पाटील, डॉक्टर अजीत गवळी, मेजर अरविंद रानडे एडवोकेट डॉक्टर रेश्मा पाटील,एडवोकेट सचिन जोशी यांचे सुयोग्य मार्गदर्शन मित्र सुनिल प्रधान, सुहास गानू हा योगा ,पत्रकार शुभाष म्हात्रे,प्रदीप पाटील फायर अधिकारी नितीन वागळे, श्रीपाद लेले, संदीप ढापरे, हॅम रेडिओ बापट, सत्यम पाटील आणि सौ. जयश्री पाटील,पल्लवी प्रसाद वैद्य, विजया कुडव,सुरेश खडपे,विकास रणपिसे, मिलिंद पाटील,महाराष्ट्र पोलीस, 108 रुग्णवाहिका,102 रुग्णवाहिका,वनखाते,महसुल खाते,आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे सहकार्य अशे अनेक जण सहकारी आहेत. समाजात अभ्यासु असतात त्याना संधी दिली जात नाही किव्हा मिळत नाही किव्हा मला जमेल कसे? असे अनेकांना वाटत असते. प्रयत्न केले तर काही अवघड नसते, मित्रांनो डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली की सारे श्यक्य आहे.आणि कायम ध्येय समोर पाहिजे,आम्ही प्रथम देश नंतर माझे गाव, कुटुंब आणि मी ही भूमिका ठेवली तर आदरणीय डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड चा युवक प्रकाशन प्रसंगी सांगितले होते,जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही,करीत रहा,आज मला सामाजिक क्षेत्रातील समाज प्रबोधनकार म्हटले जाते. आतापर्यंत देशभरात 517 प्रत्यक्ष व्याख्याने सोबत आकाशवाणी मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथून लाखो नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन चे धडे दिले याचा मला अभिमान आहे, जीवनात वेळेचा सदुपयोग करा,आपल्या निवृत्ती नंतरचा वेळ सार्थकी लावा पहा किती आनंद होतो,या अफाट कार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी नुकताच मला डॉक्टरेट पदवी बहाल केली. आता रायगड जिल्हा परिषदेच्या ८०४ ग्रामपंचायत मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रम करावयाचे आहेत आणि हे सर्व आपल्या सहकार्य मुळेच तर 1000 व्याख्याने करून ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मानस आहे.= रायगड भुषण प्रा.,डॉ.जयपाल पाटील ,राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाज संस्था, संचालक, छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती, माजी जनसंपर्क अधिकारी नागरी संरक्षण दल रायगड व सदस्य, रायगड जिल्हाधिकारी आपत्ती प्रतिसाद दल, मो.९६७३७२७२७७*
Comments
Post a Comment