✍️जीवन सुगंध!!!!!


मी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझरच्या नोकरीनिमित्त माझे गाव शहाबाज सोडून मी कुरूळ येथील निसर्गरम्य वसाहतीत रहावयास आलो. 30 वर्षांपूर्वीचे समुद्रकिनारी वसलेले अलिबाग गाव आपलेसे झाले. सुट्टीत सार्वजनिक वाचनालयात नियमित जाणे असल्याने एकदा रस्त्यात चक्कर येऊन आदिवासी* *बांधव पडलेला दिसला त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेल्याने त्याच्यासोबत मैत्री झाली,तो एक दिवस आड वररसोलीच्या तलावातून सुंदर ताजी कमळे, विकावयास आणत असे,त्या वेळेपासून आदिवासी समाजाला मदत करावयास हवी अशी प्रेरणा या लहान्यामुळे मिळाली. पुढे अलिबाग लायन्स क्लब चा सभासद. पदाधिकारी. ते 25 व्या वर्षाचा अध्यक्ष झाल्याने या समाजासाठी कायम आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, श्री* *सेवा मेडिकल ट्रस्टचा अध्यक्ष असल्याने 24 तास रुग्णवाहिका सेवेचा लाभ जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देणे, पोलीस ठाणे तहसील कार्यालयात, रेशन कार्ड बनवून देणे व विविध अडचणींना मदत हे कायम होत आले. त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी, व्यसनमुक्तीसाठी शिबिरांचे आयोजन करणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळेतील 25 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सुरक्षित जीवन जगण्यास तयार केले. जाऊ त्या वाडीवरील आदिवासी बांधवांना शिक्षणाची माहितीचे कायम प्रबोधन, रत्नागिरी टाईम चा* *जिल्हा संपादक असल्याने आदिवासी समाजासाठी आलेल्या योजनांची प्रसिद्धी आणि माहिती देणे. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील रामराज जवळील आदिवासी वाडीवरील बांधवांना,विहीर, कसेल त्याची जमीन यानुसार वनखात्याची प्रत्येक शेतकऱ्याला 7/12 मालकिचा तयार करून दिला.  मी मालक व संपादक रायगडचा युवक चा असल्याने दरवर्षी माझा दिवाळी अंक प्रकाशित होत असे. सर्वसाधारणपणे दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर सिनेमा जगतातील सुंदर नट्यांचे छायाचित्र कायम असायचे. मी मात्र माझा आदिवासी समाजाचा कमळे विकणारा मित्र लहान्या याचे मी काढलेले छायाचित्र  मुखपृष्ठावर छापले आणि रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या सांस्कृतिक संस्थेने जी राज्यभरातील* *मराठी भाषेचा विकास व्हावा म्हणूनदिवाळी अंकांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करते.त्याचा उत्कृष्ट रुपये 10 हजाराचे बक्षीस जाहीर झाले होते, दिवाळी अंक आणि रुपये 1000 मी लहान्यास दिल्यावर साधारण महिनाभर तो दिवाळी अंक अलिबागेत दाखवीत असे. त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आजही मला आठवण  देतो. मी आदिवासी समाजाचा मित्र मागील 25 वर्ष करीत असलेल्या कार्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या* *आदिवासी विकास मंत्रालयाने सन 2019-20 चा आदिवासी सेवक पुरस्कार राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी रुपये 20 हजार, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र  नाशिक येथे दिले. आणि आदिवासी बांधवांची सेवा करणाऱ्यास प्रेरणा देणाऱ्या आदिवासी मित्र लहान्याच्या आठवणीने जीवन सुगंध झाले-*   *रायगड भुषण प्रा.जयपाल पाटील,अदिवासी सेवक,आपत्ती* *व्यवस्थापन तज्ञ,राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषक समाज संस्था,(मुंबई,विभाग) संचालक, छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती,  आपदा प्रशिक्षक कृषी मित्र,प्राणी मित्र(महाराष्ट्र शासन)*

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.