आपले सर्वांचे बाबासाहेब
नमन असो
भारतीय संविधान व राज्यघटनेचे शिल्पकार भारताच्या स्वातंत्र्य पूर्वी रोजगार, श्रम, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व विमान वाहतूक मंत्री होते. देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्याकडे कायदेमंत्री हे खाते सोपविले. पत्रकारितेच्या क्षेत्रात मूकनायक चे संपादक, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, जलनितीतज्ञ, शोषण आणि अन्यायाला बळी पडलेल्या शेतकरी शेतमजूर, कामगार, बहुजन समाजाचे उद्धारक यामुळे आम्हा रायगडच्या शेतकऱ्यांना त्यांच्या वकिली क्षेत्रातील गाढा अभ्यासाचा फायदा झाला.व त्याचे उपकार कोणीच विसरू शकत नाहीत. आम्ही रायगडचे शेतकरी इतिहासाच्या नोंदीप्रमाणे आमचे पूर्वज आळंदी वरून रायगडला आले. विशेष करून समुद्रकिनारी राहून तेथील खोतांच्या, सावकारांच्या मालकीच्या शेतीचा विकास केला, मिठागरे, भात शेती करावयास अगदी उदरनिर्वाह पुरते धान्य मिळत असायचे आणि सावकारांची कोठारे भरलेली असायची. त्या काळात रायगडात 5 हजाराहून अधिक खोत, सावकार असल्याने सर्व जमिनी त्यांच्या आणि काम करणारे शेतकरी यांना न्याय मिळावा म्हणून अलिबाग तालुक्यातील त्या काळातील तडफदार सर्वांचे लाडके शेतकरी धेंरडचे स्वर्गीय नारायण नागू पाटील, पोलादपूरचे अनंत चित्रे, महाडचे सूरबा नाना टिपणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शेतकऱ्यांची या सावकारांच्या गुलामगिरीतून मुक्तता करण्याबाबत भेट घेतली होती.अलिबाग तालुक्यात सरी येथे सन1934 साली होणाऱ्या शेतकरी परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविण्यास 16 डिसेंबर 1934 ला मुंबई येथून समुद्र मार्गे रेवस बंदरात पोहोचले. त्या काळात 2000 शेतकरी सारळ येथे स्वागताला उपस्थित होते. चरी येथे झालेल्या शेतकरी परिषदेस 6000 शेतकरी उपस्थित होते. आणि विशेष म्हणजे सर्व जाती-धर्माचे होते. आणि खोती पद्धत संपुष्टात यावी. व करणार्या शेतकऱ्यांना शेती मिळावी. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 सप्टेंबर 1937 साली मुंबई विधानसभेत मागणी केली. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली10 हजार शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत काढला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्माचे कार्य करणारे महानायक होते. कोकणातील शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी लढा आजही आम्हाला शेतकरी म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणादायी आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व भारतातल्या अठरापगड जाती धर्मातील जनतेचे आहेत. हे कोणीही विसरु नये. यांच्या जयंती सोबत शेतकरी आमचे अलिबाग धेंरडचे स्व. नारायण नागू पाटील, सुरबानाना टिपणीस महाड, अनंत चित्रे पोलादपूर यांनाही त्यांच्यासोबत नमन करतो.-समाज भुषण, डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार,महाराष्ट्र शासन, अदिवासीसेवक, रायगडभूषण डॉ.जयपाल पाटील
Comments
Post a Comment