✍️ओरिसात चक्रीवादळाने नुकसान कमी होऊ दे!

 निसर्गाच्या कोपामुळे    ओरिसा मध्ये दाना चक्रीवादळ समुद्र मार्गे जवळ येत असताना काय नुकसान होईल हे सांगता येत नसल्यामुळे तेथील  जिल्हा प्रशासन मदतीसाठी सतर्क झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील ज्या गावांना जास्त धोका संभवतो तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे कार्य जोरात सुरू असून तेथील जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने केंद्र सरकारच्या गृह खात्याकडून आलेल्या आदेशाने तेथील समाजसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी- विद्यार्थिनी यांना जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती मित्र व आपत्ती मैत्रिणी याचे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात दिले असून तेही प्रशासनास मदत करण्यास तत्पर झाले आहेत. हाच अनुभव रायगड जिल्ह्यात २  वेळा आलेल्या चक्रीवादळामुळे प्रत्येक तालुक्यात१५-२०  आपत्ती मित्र -आपत्ती मैत्रीण यांना प्रशिक्षण दिलेले आहे. आम्ही रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे आदिवासी आश्रम शाळा,अनेक शाळा,महाविदयालयात, ग्रामपंचायतीत आम्ही प्रशिक्षण दिलेले आहेत. सह्याद्रीच्या डोंगर कपारीत वसलेले अनेक गावांना धोका निर्माण झाल्याचा अहवाल केंद्र सरकारने पाठवल्यामुळेच नुकताच भर पावसात आम्ही रायगडातील खालापूर तालुक्यातील १२ दरड ग्रस्त ग्रामपंचायतीत नागरिकांना धोकादायक गावांना तेथील नागरिकांना शासनाने दिलेल्या नवीन जागी स्थलांतर करावे अशा नोटीसा दिलेल्या असताना सुद्धा तेथील ग्रामस्थ ऐकत नाही म्हणूनच 12  दरडग्रस्त गावात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रबोधन केले, डोंगराच्या कडेला आणि नदीच्या बाजूला कोणीही घरे बांधू नयेत यासाठी गावात ग्रामसेवक व तलाठी,कोतवाल यांना जबाबदार धरावे, ज्यामुळे जीवित व पशु हानी, घराचे नुकसान होणार नाही अशी मागणी देशाचे पंतप्रधान आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख यांच्याकडे मागणी केली आहे. मागील काही वर्षात रायगडात  फार मोठ्या आपत्ती येऊन जनतेचे व शासनाचे नुकसान झाले आहे.हे होऊ नये म्हणून रायगडचे माजी जिल्हाधिकारी श्री. महेंद्र कल्याणकर आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील या दोघांनी आमचे आपत्ती व्यवस्थापनाचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचले असल्याने रायगड जिल्हातील 811 ग्रामपंचायतील  नागरिकांना आपत्ती व सुरक्षा विषयक ज्ञान देण्याचे काम दिले आणि विशेष म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये ग्रामपंचायतीत नागरिकांना आपत्ती व सुरक्षा विषयक धडे देणारी पहिली जिल्हा परिषद ठरणार आहे. महाराष्ट्रात निवडणूक असल्याने आचारसंहितेमुळे हे प्रशिक्षण सध्या थांबविले आहे. निवडणूक सपंताच पुन्हा ग्रामपंचायतीचे कार्य सुरू करून शाळा आणि कॉलेजमधील किमान 5000 विद्यार्थ्यांना आपत्ती मित्र आणि मैत्रीण म्हणून प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. आता ओरिसामध्ये चक्रीवादळात कार्य करणाऱ्या आमच्या प्रशिक्षित आपत्ती मित्र व मैत्रिणींना हिम्मत आणि ताकद मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि चक्रीवादळाने नुकसान कमी होऊ दे  अशी आशा व्यक्त करतो-- प्रा. डॉ. जयपाल पाटील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ मो.९६७३७२७२७७

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.