✍️कायम लक्षात राहणारी दिवाळी!
आमचे वडील रायगड पोलीस दलात शिपाई म्हणून खालापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. घरात आईसोबत बहीण आणि आम्ही दोन भावंड होतो. तेथील रायगड जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीच्या वर्गात मी शिक्षण घेत होतो. महाजनांच्या चाळीत आम्ही राहत होतो आम्ही पोलिसाची पोर म्हणून आमच्याकडे बघण्याचा शेजाऱ्यांचा दृष्टिकोन त्याही काळात एक वेगळा होता. मात्र शाळेत आम्ही हुशार होतो, माझा वर्गमित्र प्रकाश जंगम चे घर समोरच होते त्याचे वडील टेलर काम करीत असत त्या काळातील तो सुखी कुटुंबातील होता.पुढे तो रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यात गोडाऊन, तपासणीस म्हणून नोकरी करून सेवानिवृत्त झाला. आजही त्याच्या कुटुंबासहित सर्वांची भेट होते, आणि दिवाळीच्या वेळेची आठवण येऊन डोळ्यातून अश्रूधारा निघतात. सोबत अशोक मारवाडी याच्या वडिलांचे दुकान होते , दोन-चार मित्र जीवाचे होतोअजून आला नाही त्या काळात सणानिमित्त दोनशे रुपये पगारातील ॲडव्हान्स मिळत असे त्यामुळे आमच्याकडे दिवाळीचा फराळ झाला नाही म्हणून आईने सांगून ठेवले की कोणी विचारले तर फराळ उत्तम झालेला आहे असे सांगावे सुट्टीमुळे आम्ही मित्र गावाशेजारील भाताच्या शेतात टटोर्या खाण्यासाठी जात असू मध्येच प्रकाश जंगम त्याच्या आईने बनवलेला दिवाळीचा फराळ आम्हा मित्रांना हनुमंताच्या मंदिरात घेऊन आला आम्ही तुटून पडलो त्याला विनंती केली एक करंजी आणि एक लाडू बहीण भावाला देऊ का रे? त्यांनी कागदात बांधून दिला आणि तो मी घरी घेऊन आलो आईला लपून बहीण आणि भावांना दिल्यावर तेही खुश झाले, त्यातला बेसनचा लाडू उत्तमच होता दुसऱ्या दिवशी जंगम च्या घरी गेल्यानंतर त्याच्या आईला म्हणालो काकू बेसनचा लाडू उत्तम केलात. पत्त्याने दिली आम्हाला दिवाळी मारुतीच्या मंदिरात घरातून चोरून आणलेली दिवाळी मित्रांना दिली म्हणून पक्याला आई बाबांनी बेदम झाडून ठोकला आणि तोंडावरची चव विरून गेली आणि कायमची दिवाळी लक्षात राहिली, मी पोलिसाचा पोर, पुढे पोलिसांनाच आपत्ती व्यवस्थापनाचे घडे देऊ लागलो, त्यांच्या पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेचा सल्लागार म्हणून मी काम पाहू लागलो, तीस वर्षाच्या अखंड समाजसेवेमुळे सन 2024 ला आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी माझी पद्मश्री साठी निवड केली आणि एका पोलीस निरीक्षकांनीच मला न विचारता माझा चुकीचा अहवाल पाठवून पद्मश्री घालवली हे नसे थोडके,आज आमची रोजच दिवाळी आहे आम्ही पोलिसांच्या पोरांनी जी अनुभवलेली दिवाळी कोणावर अशी पाळी येऊ नये असे वाटते आजचे पोलीस दल सुखी समाधानी आहे, आजही आमच्या काळातील मुलं मुली भेटतात, आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षणामुळे कशी प्रगती झाली याचे अनुभव मिळतात आणि जीवन आनंदमयी होतो.हे विचार माझ्या डिझेल इंजिन या चरित्र ग्रंथातील आहे. आज दिवाळीची नरक चतुर्दशी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा! आणि सुरक्षित जीवन राहो- डाँ.जयपाल पाटील
Comments
Post a Comment