✒️मी गुणवंत कामगार!
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर थळ येथे 1979 ला मटेरियल कलेक्टर कमवाहन चालक म्हणून नोकरीस लागलो. कारखान्यासाठी लागणारे साहित्य मुंबई, ठाणे, पुणे येथून आणावयाचे काम माझे होते. कारखान्याला लागणारी चार ते 26 चाकी वाहने सुद्धा आणली, पेण ते थळ रेल्वे लाईन कारखान्याची सुरू झाली. मध्य रेल्वे कडून 2 इंजिन खरेदी करण्यात आली. जीवनात शिकत राहायचे ही भावना असल्याने माझी जनरल मॅनेजर यांनी रेल्वे इंजिन पायलट म्हणून नियुक्ती केली. प्रशिक्षणासाठी मी, माझी पत्नी जयश्री, माझी कन्या बाळ पल्लवीला घेऊन शकूरबस्ती, दिल्ली येथे प्रशिक्षणास गेलो, आमची तिघांची पहाडगंज नवी दिल्ली येथे एका हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती. आणि तेथे मला रेल्वे इंजिन चालविण्याचे अधिकृत परवाना मिळाला. त्यावेळी मी पानिपत, मसूरी, हरिद्वार,ऋषिकेश येथे शनिवार रविवार पाहण्याचा आनंद घेतला. जाताना राजधानी एक्सप्रेस येताना विमान प्रवास आयुष्यात प्रथम अनुभवला. आम्ही आर.सी.एफ. थळ मध्ये सुरुवातीला 19 जण होतो, नंतर वाढ होऊ लागली येथे 23 वर्ष नोकरी करून व्ही.आर.एस. घेऊन समाजसेवा करू लागलो.छायाचित्रण वाचनाची लेखनाचीआवड म्हणून माझे पत्रकारितेतील गुरु कैलासवासी भाऊ शिनकर यांनी मला वार्ताहर केला कारखान्यात होणारे कार्यक्रमाचे छायाचित्र व जमेल तशी बातमी करू लागलो आणि पत्रकार झालो अलिबाग लायन्स क्लब चा सदस्य सचिव उपाध्यक्ष आणि पंचविसाव्या वर्षीचा अध्यक्ष झालो महाराष्ट्र शासनाने आरसीएफ मध्ये पहिला गुणवंत कामगार पुरस्कार दिला त्यानंतर भारत सरकारने कामगार कवी म्हणून रशियाला कामगार अभ्यास दौऱ्यावर संधी दिली आणि त्या काळात बालकवी म्हणून मास्को आणि ताश्कंद आकाशवाणी वरून माझी मुलाखत झाली, त्यापूर्वी आकाशवाणी मुंबई आणि रत्नागिरी वरून लहान मुलांच्या कविता प्रसारित होत होत्या चेंबूर आर.सी.एफ. येथे असलेली कामगार युनियन थळला आणल्यामुळे स्थानिक राजकीय पक्षाचे नेते कायम नाराज झाले, त्यांच्या पक्षाचे असलेले काही कामगार यांनी बरोबर माझ्या बाबतीत राजकारण खेळले. मी मात्र समाजसेवेत अखंड गुंतलो कामगार म्हणून आयुष्यभर लक्षात राहिलेले कामगारांसाठी केलेले काम आजच्या दिवशी मनाला आनंदित करते. त्या काळात रायगड जिल्ह्यात बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांनी आर.सी.एफ. एच. ओ. सी., एच. आय. एल. केंद्र सरकारच्या अत्यारितले कारखाने आणले. त्यामुळे अनेकांचे कल्याण झाले, एच. आय. एल. कंपनी डीडीटी पावडर तयार करणारे आणि ती कंपनी अडचणीत आली कामगार व अधिकारी यांचे पगार द्यायला कंपनीकडे पैसे राहिले नाही. त्यांच्या कर्मचारी युनियनने गुणवंत कामगार व काँग्रेस आई पक्षाचा सचिव म्हणून कार्यरत असल्याने मला विनंती पत्र दिले. माझे राजकीय गुरू रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एडवोकेट दत्ताजीराव खानविलकर यांच्या पत्राने केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्याकडे पाठविले. त्यांची भेट घेतली आणि आमची अडचण सांगितली. त्यांनी तातडीने केंद्रीय कामगार मंत्री पी. ए. संगमा यांच्याकडे पाठविले रायगडकर म्हणून तातडीने सचिवांना बोलावले बॅरिस्टर अंतुले साहेबांचे काम सायंकाळपर्यंत थांबून कंपनीला मद्रास महानगरपालिकेची मोठी डीडीटीची ऑर्डर देण्यात आली व कंपनीची राहिलेली कोट्यावधी रुपयाची बिले अदा करण्याचे आदेश झाले. प्रिय संगमा साहेब आणि बॅरिस्टर ऐ. आर. अंतुले साहेब यांचे आभार मानून आम्ही रायगड गाठले कंपनीचे शेकडो कामगार आणि अधिकारी यांचे कल्याण झाले. ते आजही पर्यंत कंपनी चालू आहे, पुढे कंपनीने 26 जानेवारीला बोलावून माझा मान सन्मान केला. हे कामगारांसाठी केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे होते असे मी मानतो.आरसीएफ सोडल्यानंतर पूर्णवेळ समाजसेवेचे कंकण हाताला बांधले महाराष्ट्र शासनाने नागरी संरक्षण दलाचा रायगडचा जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली सन 2015 पासून गुणवंत कामगार म्हणून कामगारांना होईल तेवढी मदत पत्रकारितेची लेखणीने ही न्याय देणे अभ्यास आणि निश्चय दांडगा असेल तर कामगार आपली व इतरांची प्रगती करू शकतो ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात 601 प्रत्यक्ष व्याख्याने त्यामध्ये आकाशवाणी मुंबई येथून शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा रत्नागिरी येथून युवक आणि युवतींची आपत्ती सुरक्षा सोलापूर येथून कामगारांची आपत्ती सुरक्षा कोल्हापूर येथून ज्येष्ठ नागरिकांची आपत्ती सुरक्षा पुढे येथून महिलांची आपत्ती सुरक्षा असे लाखो नागरिकांना प्रशिक्षण साहित्य क्षेत्रात 11 पुस्तकांचे लिखाण आपत्ती व्यवस्थापनामुळे जागतिक आपत्ती 4थी, 5वी, 6वी परिषदेपर्यंत वाटचाल यामुळे महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल "आदिवासी सेवक" अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग बांधवांसाठी केलेले कार्य यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर "समाज भूषण" पुरस्काराने रायगड भूषण असलेल्या गुणवंत कामगाराला त्याच्या समाजसेवेचे कौतुक केलं आहे तेव्हा कामगार बंधूंनो निवृत्त झाले आता काय करायचे असा विचार मनात आणू नका आपण सारे बुद्धिमान आहात आपल्या बुद्धीचा वापर समाजसेवेसाठी करा आणि जमलं तर आमच्या रायगडच्या युवक फाउंडेशन सोबत या.महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🚩 आपलाच कामगार बंधू डॉ. जयपाल पाटील
Comments
Post a Comment