✒️आमची नोंद घेतली!
मित्रांनो पत्रकार क्षेत्रात साधारण 35 वर्षाची वाटचाल, बरेच चढ उतार अनुभवले, या क्षेत्रातील अनुभवाने येणाऱ्या अडचणींवर कशी मात करावयाची याचे कायम क्षेत्रात नव्याने येणारे पत्रकार असलेले संपादक यांना प्रकाशक म्हणून देशभरात आणि स्वतःचे दिल्लीमध्ये कार्यालय असलेल्या लीपा या संघटनेत राज्य ते देशपातळीवर पदाधिकारी, साप्ताहिक संपादक म्हणून स्मॉल न्युज पेपर ऑफ इंडिया संघटनेचा राज्य पदाधिकारी ते राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून कार्य, साप्ताहिक संपादक संघटनेचा जिल्हा राज्य पातळीवरील पदाधिकारी, भारतीय पत्रकार संघ (ए. आय. जे.) चा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्य, महाराष्ट्रातल्या संपादक पत्रकार संघासाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघटनेचा संचालक आणि महाराष्ट्रातील साप्ताहिक संपादक पत्रकार छायाचित्रकारांसाठी कार्यरत असलेल्या साहित्य संगम व दैनिक युवावताचे संस्थापक संपादक श्री. किसन भाऊ हसे यांच्याही संघटने राज्य पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.हे सर्व सांगण्याचे कारण की आपण निस्वार्थपणे कार्य करीत असतो हे कोणी कौतुक करावे म्हणून नव्हे तर आपल्या मनाला आनंद मिळतो पत्रकारिते जिल्हास्तरीय व अलिबाग शहरात पहिला महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्ती उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाला त्याचबरोबर पत्रकारितेत फोटोग्राफीला अन्य साधारण महत्त्व असते याचाही मार्ग शासनाच्या राज्यस्तरीय वनखात्याचा राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे हे सर्व करीत असताना रायगड जिल्हा आपत्तीने कायम त्रासलेला अशावेळी नागरिकांना कशाप्रकारे मदत करता येईल याची मनाला खंत राहत होती यासाठी महाराष्ट्र शासनाचे नागरी संरक्षण दल असते याचा स्वयंसेवक म्हणून प्रशिक्षण घेतले, त्यासाठी त्यांचा चुलत भाऊ होमगार्ड कॉलेज मुंबई येथे प्रशिक्षण घेतले, महाराष्ट्र शासनाच्या यशदा मध्ये प्रशिक्षण घेतले, भारतीय सैन्य शिखरेजिमेंट रांची झारखंड, जागतिक आपत्ती परिषद चौथी पाचवी आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती प्रशिक्षण संस्थेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास केल्याने पत्रकार, फोटोग्राफर, वक्ता असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दलाचे जिल्ह्याचे प्रमुख श्री. मंगसुळे सर यांनी माझी त्यांच्या वरिष्ठांमार्फत मार्फत व जिल्हाधिकारी रायगड यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी नियुक्ती केली आणि माझे कार्य सुरू झाले. रायगड जिल्ह्यात पहिले 50 हजार नागरिकांना उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिल्याने रायगड जिल्हा परिषदेने मानाचा" रायगड भूषण" पुरस्कार देऊन सन्मान केला. अलिबाग कर, आमच्या जिल्ह्यातील पत्रकार मंडळी सन 2015 ला "आपत्ती आली" म्हणून टीका टिप्पणी करावयाची, आज पुढील दोन महिन्याचे कार्यक्रमातील तारखा बुक राहू लागले आहेत, मात्र हिरे पारखणारे तज्ञ असतात तसा महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार आहे, आणि महाराष्ट्र शासनाचा आपत्ती प्रशिक्षक असून यासाठी संपादक श्री. किसन भाऊ असे यांनी संगमनेर मध्ये त्यांच्या गावातील माध्यमिक विद्यालयातील 1500 विद्यार्थी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सरपंच त्यांचा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम आयोजित केला. सोबत थोरात यांचा साखर कारखाना एमआयडीसीतील 40 कारखानदार मालक यांनाही माझे आपत्ती सुरक्षेचे कार्यक्रम राबविले हे पत्रकार क्षेत्रातील महान कार्य होय. आज त्यांचा दूरध्वनी आला व्हाट्सअप आणि फेसबुक वर कायम संपर्कात राहून वेळोवेळी सूचना देतात माझ्या अलौकिक कार्याबद्दल मनापासून अभिनंदन केले. विशेष म्हणजे आता रायगड कारागृहातील 200 बंदीवाणांसाठी होणाऱ्या कार्यक्रमाबाबत चर्चा केली आणि आतापर्यंत यामध्ये मुंबई आकाशवाणी वरून शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा, रत्नागिरी आकाशवाणी वरून युवक व युवतींची सुरक्षा, कोल्हापूर आकाशवाणी वरून ज्येष्ठ नागरिकांची आपत्ती सुरक्षा, सोलापूर आकाशवाणी वरून कामगारांची आपत्ती सुरक्षा आणि पुणे आकाशवाणी वरून महिलांची सुरक्षा अशी व्याख्याने देऊन महाराष्ट्रातील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचलो आहे, सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या 811 ग्रामपंचायत मध्ये माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी हा कार्यक्रम सुरू असून संपूर्ण भारतातील अशाप्रकारे नागरिकांना सुरक्षेचे धडे देणारी रायगड जिल्हा परिषद होणार आहे. मागील 25 वर्षाच्या समाजसेवेचे प्रतीक म्हणून महाराष्ट्र शासनाने मला गुणवंत कामगार, आदिवासी सेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, शासनाचेही आभार! देशभरात 600 कार्यक्रम पूर्ण होऊन 1000 ग्रिनीच वर्ल्ड रेकॉर्ड कडे वाटचालीच्या शुभेच्छा देऊन आपली संघटना आपण आपत्ती व्यवस्थापन चे कार्य केले ते महाराष्ट्रातील जनतेला माहीत व्हा यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेत पुस्तक रूपाने प्रकाशित करणार असून त्याचे प्रकाशन समारंभ यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे करण्यात येणार असल्याची माहिती दिली माझ्या देशसेवेची श्री. किसन भाऊ असे यांनी नोंद घेतली त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाची महाराष्ट्रातील लोकप्रिय दैनिके साप्ताहिके मासिके सोशल मीडियावर फेसबुक व्हाट्सअप ट्विटर नोंद घेता त्याला प्रसिद्धी देतात त्यांचेही मनापासून आभार मानतो. मी एवढे काय सुरक्षेचे ज्ञान देतो हे कार्यक्रमास येणारे अनुभवतात पुढील महिन्याच्या तारखा वहीत लिहाव्या लागतात याचे श्रेय आमचे रायगडचे लोकप्रिय खासदार श्री सुनील तटकरे भाषण कलेचे गुरु महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट दत्ताजीराव खानविलकर आणि रायगडच्या जनतेसाठी काहीतरी करा असे सांगणारे अध्यात्मिक गुरु डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा मी आभारी आहे आत्ता सत्तरीच्या उंबरठ्यावर पोहोचलो असलो तरी देशसेवा सुरू असून आपत्तीवरील 1000 व्याख्यानांचा ग्रीनिच वर्ड रेकॉर्ड निश्चितच करणार असे ध्येय आहे. ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील
Comments
Post a Comment