देशसेवेत सामील व्हा

✍🏻 निवृत्तीनंतर काय? विचार  करणाऱ्यांसाठी,आपल्या  ज्ञानाचा वापर  समाजासाठी कराच आनंद  मिळुन  देशसेवेत सामील व्हा. 
मी राष्ट्रीय केमिकल आणी फर्टीलायझर लि.भारत सरकार चेंबूर येथील  कारखान्यात काम करीत होतो. खेळाची आवड असल्याने त्या काळात  आर.सी.एफ.चेंबूर च्या क्रिकेट टीम चा विकेट  किपर होतो,माझा जोडीदार मित्र हा बलविदंरसिंग सिंधु  होता. तो पुढे महाराष्ट्र संघात पोहोचला , खेळात एकदा बाॅलर गोलंदाजीच्या वेगवान फेकीने माझा डाव्या हाताचा अंगठा  क्रॅक झाला आणी क्रिकेट  कायमचे बंद झाले आणी थळ येथे आलो ,अंगामधे खेळाडु वृती असेल आणी मित्र परिवार उत्तम असल्यास संधी  असतेच अलिबाग जेल समोर शासनाचे अथिँक  कार्यालयात माझे मित्र श्री.प्रदिप पाटील हे अधिकारी असल्याने ते आणी त्याचे सहाय्यक  बॅडमिंटन खेळत असत,आरसीएफ चे मी,माझे 2बंधु विश्वास, सतीश, रवींद्र लोंढे,विनय गोविलकर  असे रोज एकत्र येऊन  सराव करत होतो,थोडा महागडा खेळ पण तंदुरुस्त  व आनंद देणारा बॅडमिंटन खेळाची आरसीएफचा संघ म्हणून पर्सनल  अधिकारी श्री.एम.डी.पाटील यांनी  मान्यता दिली.आणी आम्ही  5जणानी जिल्ह्यात पहिला,दुसरा क्रमांक  मिळवून  आमचे आणी कंपनीचे नाव लौकिक केले.जयपाल आणी रवींद्र लोंढे, विश्वास, सतीश, गोविलकर  कोर्टात उतरले की विजय नेहमीच मिळवत गेलो,स्पधेॅत   रसिक आणी कॉलेजची मुले मुलींची  गर्दी पाहून  प्रतिस्पर्ध्यावर  तुटुन पडताना आनंद मिळायचा आणी जिंकून आल्यावर महाव्यवस्थापकाकडुन कौतुक आरसीएफने प्रत्त्येक खेळातील खेळाडुंना संधी,कौतुक केलेच या बद्दल चेअरमन श्री.दुलीपसिंह, आणी वरिष्ठ अधिकारी यांचे आभार,वेळेचा कायम सद ऊपयोग  केल्याने महाराष्ट्र  कामगार कल्याण मंडळाने पहिला गुणवंत कामगार पुरस्कार  देऊन सन्मानित केले.मला पत्रकारीतेची संधी भाउ सिनकर यांनी दिली त्याला 40वर्ष पुर्ण झाली. खास करून तरुण, तरुणीनी आपल्या आवडीनुसार  खेळात  लक्ष ठेवावे आणी आपले नाव, आई-वडील, गावाचे नाव उज्वल करा,मी आरसीएफ मधुन सेवानिवृत्ती घेऊन सिव्हिल डिफेन्स बोरी-ऊरण चा जनसंपर्क अधिकारी होऊन, शिक्षण, प्रशिक्षण घेऊन  जागतिक पातळीवर पोहचून लाखो नागरिकास आपत्तीव्यवस्थापन चे प्रशिक्षण देतो,आणी ही काळाची गरज आहे. आणी सेवानिवृत्त  असाल तर आमच्या रायगड चा युवक फाउंडेशन  सोबत याच आपले स्वागत आहे.मी जागतिक पातळीवर गेल्याने भारती विद्यापीठ पुणे येथून निमंत्रण आले  आपलाही ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड करण्यास हातभार लागावा.-प्रा.डॉ.जयपाल पाटील,,आपत्तीव्यवस्थापन तज्ञ मो.9673727277

Comments

Popular posts from this blog

✍🏻आठवण बिबट्याची!

✒️युवकांनो तुम्ही भाऊ किंवा भाई बनायचं ठरवा!

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर मध्ये रेल्वे इंजिन पायलट म्हणून नोकरीस असताना थळ ते पेंण येथे कायम प्रवास पेण येथे रेल्वे स्टेशनवर दररोज2 ते 3 तास रिकाम्या वॅगन अथवा रिकाम्या अमोनिया टॅन्क साठी थांबावे लागायचे. यामुळे पुस्तके वाचन व कविता लिहिण्याची सवय झाली. कंपनीच्या हाऊस जनरल पुस्तकात कविता छापू लागल्या, लहान मुलांची बडबड गीते आकाशवाणी मुंबई" गंमत जंमत" कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी" पालवी" कार्यक्रमात बडबड गीते प्रक्षेपित होत होती आणि त्यापैकी 60 कविता रशियाच्या माॅस्को व ताश्कंद आकाशवाणीवरून प्रकाशित झाल्यावर कामगार कवी म्हणून रशियन सरकारने अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली. कवितेचे वाचन करणारा म्हणून रायगड जिल्ह्यातून प्रथम रशियात पोहोचलो. त्या काळात दिनांक 16/ 8/ 1998 साली कोकण मराठी साहित्य परिषद नवी मुंबई राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला होता. यावेळी प्रमुख पाहुणे मधु मंगेश कर्णिक, तर नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष परेन शिवराम जांभळे यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला होता.त्यानंतर अनेक तालुका जिल्हा व राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत होतो. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने कविता कशा कराव्यात याचे प्रशिक्षण चिखलदरा येथे आयोजित केले होते. त्यामध्ये जेष्ठ कवी शांता शेळके, श्री.फ.मु. शिंदे यांचेकडून मार्गदर्शन झाले. आणि माझा पहिला बाल काव्यसंग्रह मैत्री गाणीच्या प्रस्तावनेसाठी रायगडचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री.विजय पवार यांनी मी पत्रकार असल्याने त्यांच्या नाशिक निवासस्थानी नेले. दुसऱ्या दिवशी कै वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची भेट घडवली. कविता पाहून छोट्यांसाठी एक लाडू कविता सादर करून त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकास प्रस्तावना दिली आणि मला अत्यानंद झाला. त्यानंतर माझे दुसरे पुस्तक गंमत गाणी संगीताची आवड असल्याने भजनाचे "आम्ही देवाचे भक्त" आम्ही वेडे कवी म्हणून" घंटी" काव्यसंग्रह, वृत्तपत्र व साप्ताहिकात छापलेल्या लेखांचे "विचार करू या" आणी सामाजिक चिंतन, महिलांसाठी विविध शासकीय योजनांचे "महिलांनो तुमच्यासाठी" मी केलेला कामगार अभ्यास दौरा व 16व्या जागतिक कृषी प्रदर्शनाचा अभ्यास दौरा यावरील "रशिया",व "इस्रायल" ही प्रवास वर्णने बालकथा संग्रह "थापाड्या गणप्याची धमाल" कथा संग्रह "व्यथा जीवनाची", "योजना सरकारी" महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या.व"आपत्ती व्यवस्थापन", "शेतकऱ्यांची आपत्ती सुरक्षा" पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर, 14 वर्ष साप्ताहिक रायगडचा युवक दिवाळी अंक, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त असा साहित्यिक, सोबत समाजसेवेचे वारकरी, महाराष्ट्र शासनाने कामगार क्षेत्रातला "गुणवंत कामगार" पुरस्कार, आदिवासी समाजाची विशेष सेवा केल्याबद्दल, "आदिवासी सेवक" पुरस्कार. दिव्यांग अल्पसंख्यांक ओबीसी समाजासाठीसेवा केल्याबद्दल "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण" पुरस्काराने गौरविले. आणि. श्री गजानन विद्यालय कडाव कर्जत येथे 6/8/2012 वर्षारंभ पाऊस कविता कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थिती, यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण, 26 नोव्हेंबर 2013 ला निंमत्रित कवी, साहित्य परिषद पुणे या संस्थेचा अजीव सभासद असून महाराष्ट्र शासन ग्रंथोत्सव 28 जानेवारी 2016 रोजी निमंत्रित कवी ग्रंथोत्सव 2017 16 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरला निमंत्रित कवी सन 2024 ला को.म.सा.प. कर्जत शाखेने रायगड "साहित्यरत्न" पुरस्काराने महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य व रायगड भूषण प्रा. डॉ.एल. बी. पाटील व को.म.सा.प. कर्जतचे अध्यक्ष कुणब्याचं पोर चित्रपट निर्मातेकवी,पत्रकार अँड. गोपाल शेळके यांनी सन्मानित केले. यावेळी पावसाळी सहली पाण्यातून ज्येष्ठ नागरिकांना कसे बाहेर काढावे. याचेही प्रात्यक्षिक कवी कवियत्रींना यावेळी दिले,आणि काव्य संमेलनात सध्याच्या विषयी "दंगल" या कवितेचे वाचन केले आनंद आहे असे,आम्ही कवितामुळे परदेशात कविता पोहचविणारे रायगडचेआम्ही कवी.